स्वर्णिम भारतासाठी कटिबद्ध व्हा : अर्चना दीदी

सेलूत सरपंचांचा स्नेह संवाद मेळावा, ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाचा उपक्रम

सेलू : गावागावांत शांती, समाधान, समृद्ध आणि आरोग्यदायी वातावरण निर्मितीमध्ये सरपंच, उपसरपंच यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी मन, बुद्धीची स्वच्छता ठेवून, ईश्वरीय जबाबदारीने कार्य करीत, स्वर्णिम भारतासाठी कटिबद्ध होऊया, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या परभणी जिल्हा प्रभारी बी.के.अर्चना दीदी यांनी शनिवारी (२३ एप्रिल) येथे केले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सेलू (जि.परभणी) येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त, शनिवारी (२३ एप्रिल) सरपंच, उपसरपंचांचा स्नेह संवाद मेळावा उत्साहात झाला. त्या वेळी अर्चना दीदी बोलत होत्या. या वेळी शिवपार्वती महिला बँकेच्या अध्यक्षा मीनाताई बोर्डीकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, शिवसेनेचे जिंतूर-सेलू विधानसभा प्रमुख रामनाना खराबे पाटील, उद्योजक रामप्रसाद घोडके,   सेलू केंद्राच्या संचालिका बी.के. सविता दीदी‌, वालूर केंद्र संचालिका वैशाली दीदी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

अशोक काकडे म्हणाले, ” व्यक्ती, कुटुंब, समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाचा जीवनात भगवंताचे अधिष्ठान असणे; तसेच ब्रह्माकुमारी विद्यालयाचे ईश्वरीय ज्ञानाचे कार्य ही काळाची गरज आहे. कवडधन येथेही ब्रह्माकुमारी विद्यालयातील ज्ञानदानाचे कार्य सुरू व्हावे. यासाठी निश्चितच पुढाकार घेणार आहे.”

रामनाना पाटील म्हणाले, “दैनंदिन जीवनात राजयोग ध्यान साधना लाभदायक आहे. ब्रह्माकुमारी विद्यालयातर्फे मोफत दिली जाते. शांत, संयमी आयुष्यासाठी ईश्वरीय ज्ञान आवश्यक असून, याचा गावागावांतील माणसाला लाभ देण्यासाठी सरपंच, उपसरपंचांनी पुढाकार घ्यावा.” या वेळी शिंदे टाकळीचे सरपंच माऊली पवार, बबनराव राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवर व सरपंच उपसरपंचांचा सन्मान करण्यात आला. बी.के.राधा दीदी यांनी विद्यालयाचा परिचय दिला. प्रास्ताविक बी.के.सविता दीदी, सूत्रसंचालन बी.के.सीमा दीदी, तर बी.के.वैशाली दीदी यांनी आभार मानले.

मेळाव्याला महेंद्र गाढे (हातनूर), रामचंद्र हिवाळे ( राजेगाव), ज्ञानेश्वर पवार (शिंदे टाकळी), शकुंतला मधुकर सोळंके (सोनवटी), दिलीप मगर (मोरेगाव), केशव डोईफोडे (ब्राह्मणगाव), राधाबाई घोडे ( पिंपरी बुद्रुक), रमेश गीते (पिंपरी), सखाराम नाटकर (बोरगाव), किशोर कारके ( गोमेवाकडी), उत्तम सोनटक्के, भाऊसाहेब झोल (करजखेडा), शरद आकात, लक्ष्मण गायके ( साळेगाव), कैलास लिपणे, बालासाहेब लिपणे ( निरवाडी), भारत इंद्रोके ( रोहिणा), नानासाहेब वनवे ( ब्रह्मवाकडी), मुंजाभाऊ काष्टे ( रोहिणा काजळे), दत्तात्रय तारडे (डिग्रस बरसाले), कल्पना कैलास मोगल, मीरा रामेश्वर मोगल (कुंडी), शिलाबाई पारधी ( बोरगाव जहांगीर), बळीराम मगर (करडगाव), नवनाथ शिंदे (खेर्डा), सुभाष आढे (पार्डी), रंगनाथ भाबट, विष्णू आवटे (खादगाव), त्र्यंबक पितळे (गोहेगाव), संजय ईघारे ( गव्हा), प्रमोद गायके ( सोन्ना), कृष्णा खंदारे (आडगाव दराडे), साहेबराव कदम, मीना गोरे (देऊळगाव गात) आदींसह सेलू तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व सेलू, सातोना, वालूर, देऊळगाव गात परिसरातील ब्रह्माकुमारी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ईश्वरीय कार्याला घाबरायचे नाही

” सुख,शांती आपल्या जवळच आहे. ती कशी मिळवयाची, हे आपले आपणच ठरविले पाहिजे. निश्चयाने आणि ईश्वरावरील दृढ विश्वासाने सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. याचे अविस्मरणीय आणि तितकेच सुंदर अनुभव मला आहेत. आपण जेवढे ईश्वराच्या आठवणीत राहू, तेवढे ईश्वर आपली काळजी घेतो. त्यामुळे ईश्वराचे कार्य करतांना घाबरायचे नाही.”

मीनाताई बोर्डीकर, अध्यक्ष, शिवपार्वती महिला बँक, परभणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!