आषाढी एकादशी : विठुमाऊलींच्या गजराने सेलू दुमदुमली, शालेय बाळगोपाळांच्या दिंड्या उत्साहात
सेलूत विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळांकडून उत्स्फूर्त स्वागत : फराळपाण्याची व्यवस्था
सेलू जि.परभणी : परभणी शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी विविध शाळांनी आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी (१८ जुलै) रोजी पर्यावरण जनजागृती, पाणी, विज बचत आदींसह महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे देखावे सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विठुमाऊलीच्या जयघोषाने अवघा आसंमत दुमदुमून गेला. बाळगोपाळांच्या दिंड्याचे ठिकठिकाणी विविध पक्ष, संघटना, मित्र मंडळाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
नूतन विद्यालयाच्या दिंडीची सुरूवात संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, डॉ.शरद कुलकर्णी, संतोष पाटील, के.के.देशपांडे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमा पूजनाने झाली. डॉ.विलास मोरे, डी.डी.सोन्नेकर, गणेश माळवे, पी.टी.कपाटे, सुधीर जोशी, भगवान देवकते, बाबासाहेब हेलसकर, अशोक लिंबेकर, काशीनाथ पल्लेवाड, सच्चिदानंद डाखोरे, अतुल पाटील आदींसह शिक्षक, शिक्षिका उपस्थितीत होते.
बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्री ज्ञानेश्वर व चांगदेव यांच्या भेटीचा प्रसंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्राचार्य नरेंद्र पाटील, भूजंग देऊळगावकर आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले.
नूतन कन्या प्रशालेच्या वतीने विद्यानगर परिसरात ज्ञानदिंडी, वृक्षदिंडी काढण्यात आली. याप्रसंगी संस्था सचिव डॉ.व्ही.के. कोठेकर, मुख्याध्यापिका निशा पाटील, दत्तराव घोगरे, रोहिदास मोगल, भालचंद्र गांजापुरकर, कीर्ती राऊत, शशिकांत देशपांडे, किशोर ढोके, कैलास मलवडे, किशोर ढोके आदींची उपस्थिती होती. बालू झमकडे मित्र मंडळ आणि श्रीमती इंदुताई पवार यांच्याद्वारे फराळाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले प्रशालेतील ज्ञानदिंडी यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक प्रतिनिधी शशिकांत देशपांडे, किशोर ढोके, नागेश देशमुख, सुनील मोगल ,बाबासाहेब थोरे, राजेश राठोड ,कैलास मलवडे, रेणुका आंबेकर, विजया खडके, वैशाली चव्हाण, सीमा सुकते, विनोद शिंदे, गोविंद शिंदे ,शंकर बोधनापोड, सुहास देऊळगावकर, सतीश कुंडीकर, पंडित जाधव ,ज्योती बिरादार, यमुना चव्हाण, रूपाली पवार, संध्या आमटे, श्रीमती रासवे, सुरेखा भांबळे, माधुरी कुंभार, बेबीताई हेलसक, वंदना वावळे, श्री कोळी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या कीर्ती कुलकर्णी, शुभांगी भाग्यवंत यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम व नृत्य पथकाने लक्ष वेधले. ॲड.किशोर जवळेकर, प्रवीण माणकेश्वर मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, बाळासाहेब हळणे व संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते. यशवंत विद्यालय, नूतन प्राथमिक शाळा, व्हिजन इंग्लिश स्कूल, कस्तुरबा गांधी बालिका, न्यू हायस्कूल विद्यालय, ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय, कान्हेकर शारदा विद्यालय, नूतन कन्या प्रशाला आदींसह अनेक शाळा दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या. ठिकठिकाणी बाळगोपाळांनी पाऊली खेळत अभंग, गवळणी, भारूडे सादर करून प्रबोधन केले.
♦विविध पक्ष, संघटनांकडून स्वागत
नूतन रोडवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी सभापती अशोक काकडे, सुधाकर रोकडे, नामदेवआप्पा डखरघुनाथ बागल यांनी स्वागत केले
क्रांती चौकामध्ये साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, चंद्रशेखर मुळावेकर, रामराव लाडाणे यांनी मुख्याध्यापकांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत केले.दत्ता पौळ, संतोष हुगे, रफिक भाई, शेख दिलावर, योगेश कुलकर्णी, इमत्याज अलीखान, नृसिह हरणे, शिवसेनेच्या वतीने माजी आमदार हरिभाऊ लहाने, संदीप लहाने, बाबा काटकर, अविनाश शेरे, बंडू देवधर, पांडुरंग कावळे, रमेश मसुरे, गजानन शेलार, दीपक निवळकर, श्याम साडेगावकर, सुनील सूर्यवंशी, अमोल साडेगावक, गणेश साखरे गोविंद टकले, हनुमान गात, कपिल ठाकूर, प्रमोद गायकवाड, भारत एडके, दिलीप बादाड, रितेश मंत्री, मितेश तोष्णीवाल आदींनी बालवारकर्यांना फराळाचे वाटप केले. भारतीय जनता पक्षाचे डॉ.संजय रोडगे, तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, अशोक अंभोरे, ॲड. संजय लोया अर्जुन बोरूळ, कपील फुलारी, संदीप बोकन, जयसिंग शेळके, वनिता चाफेकर, वाल्मिकी खुळे, प्रकाश शेरे, गणेश सवणे आदींनी स्वागत केले. संत श्री गोविंदबाबा चौकात माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची प्रतिमा देऊन मुख्याध्यापकांचे स्वागत केले. मारोती चव्हाण, साईराज बोराडे, प्रभाकर सुरवसे, राजू पटेल, रामप्रसाद गोरे, सचिन कोरडे, प्रतिक बोराडे, भारत काठोठे आदींसह विनोद बोराडे मित्रमंडळाच्या फराळाचे वाटप करण्यात आले. श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने नागेश ठाकूर यांच्यासह विविध संस्था पदाधिकारी, भाविकांनी फराळ, पाण्याची व्यवस्था केली होती.