कवी कालिदास : ‘मेघदूत’ हे चिरतरुण काव्य : डॉ.यशवंत कुलकर्णी
सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयात कार्यक्रम
सेलू : कवी कालिदासांचे ‘ मेघदूत ‘ हे लिहिण्याच्या संस्कृतीचा वारसा सांगणारे असून ते चिरतरुण काव्य आहे. यात तत्कालीन सामाजिक परिस्थिती, स्त्री वेदना, मनाची घुसमट, कुचंबना, तारूण्य, प्रेम, जीवनशैली वाचायला मिळते.’ असे मत नूतन कन्या प्रशालेतील संस्कृत शिक्षक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘ एक दिवस एक पुस्तक ‘ या उपक्रमाच्या विसाव्या भागात ते कवी कालिदास यांच्या ‘ मेघदूत ‘ या पुस्तकावर सोमवारी, २२ जुलै रोजी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ महेंद्र शिंदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाविद्यालयातील संस्कृतचे प्राध्यापक मोहन पाटील यांची उपस्थिती होती. डॉ.कुलकर्णी म्हणाले की, ‘ कवी कालिदास यांचे ‘मेघदूत’ हे वाचकांना गुंतवणून ठेवणारे आहे. पती-पत्नीच्या भावनिक नात्यांची उकल पुस्तक वाचतांना होते.’ प्रा.मोहन पाटील म्हणाले की, ‘ अलौकिक प्रतिभेचे धनी कवी कालिदास यांचे लेखन हे संस्कृत साहित्याला देणगी आहे. कवी कालिदासाच्या रचना या प्रत्यक्ष वाचून अनुभवायला हव्यात कवी कालिदासाचे ‘ मेघदूत’ हे पतीपत्नीच्या हळुवार प्रेमाची आणि विरहाची कथा आहे. ही कथा काळजाचा ठाव घेते. ‘मेघदूत’ वाचनाने नवतारूण्य प्राप्त होते.’ डॉ. महेंद्र शिंदे यांनी समयोचीत अध्यक्षीय समारोप केला. याप्रसंगी पवन फरकांडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुरेश हिवाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रणिता सोलापुरे यांनी केले. तर आभार प्राध्यापाक के.डी.वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर मुळावेकर, ग्रंथपाल महादेव आगजाळे, डॉ.शरद ठाकर, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापुरकर,विनायक धामणगावकर, प्रा.आर.एम.खाडप, प्रा. हेमचंद्र हडसनकर, रश्मी बाहेती, सुलभा बागले, ज्योती कुलकर्णी, प्रा. सुभाष बिराजदार, डॉ. जयश्री सोन्नेकर, डॉ.राजाराम झोडगे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, प्रा.अनंत मोगल आदींसह वाचक, साहित्य रसिकांची उपस्थिती होती.