आपत्तीग्रस्त गावांना आमदार मेघना बोर्डीकरांच्या भेटी

आपत्तीग्रस्त गावांना आमदार मेघना बोर्डीकरांच्या भेटी

नुकसानीचा योग्य मोबदला मिळवून देण्याची ग्वाही

सेलू : तालुक्यातील गिरगाव खुर्द ,बोरकीनी व नरसापूर गावाला पाण्याचा वेढा पडला असतांना गावकऱ्यांची अडचण लक्षात घेत, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी रविवारी रात्री साडेदहा वाजेपासून दोन वाजेपर्यंत गिरगाव खुर्द, नरसापूर ,बोरकीनी व वाई आदीं गावांना भेट देवून पशुधन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसानीचा योग्य मोबदला मिळवून देण्याची ग्वाही दिली.

अतिवृष्टीमुळे बोरकिनी येथील विठ्ठल हावळे, ज्ञानोबा हावळे, जनार्दन हावळे हे पुराच्या पाण्यामध्ये अडकले. शेवटी पाणी पाच फुटाच्यावर गेल्यावर त्यांनी एका झाडावर आश्रय घेतला. तब्बल सात घंटे ते या झाडावरच होते, हे समजतातच आमदार मेघना बोर्डीकर यांनी रात्री साडेबारा वाजता भर पावसात गावाला भेट दिली. ताबडतोब मुख्यमंत्री कार्यालयात फोन लावून एनडीआरएफ जवानांना पाठवण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, विठ्ठल हावळे यांच्या पत्नी भावुक झाल्या व दीदी तुम्हीच माझ्या नवऱ्याला वाचवू शकतात, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले. अडचणीची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद करून मदतीचे अश्वासन दिले. यावेळी यावेळी तालुका अध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, अर्जुन बोरुळ, रवि डासाळकर,अजय डासाळकर, अशोक अंभोरे, कपिल फुलारी, संदीप बोकन, शामराव चाफेकर, संदीप घुगे गिरगावचे सरपंच नामदेव शिंदे, केदारेश्वर मोगल, अभय महाजन, अमोल भोसले, गोविंद शर्मा, कृष्णा चव्हाण, जयसिंग शेळके, बाळासाहेब आघाव, भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!