भाजपचे जिंतूर तालुकाध्यक्ष ॲड.विनोद राठोड राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षात
माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रवेश
आणखी काही भाजपच्या मातब्बरांचा निवडणुकीच्या पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षात प्रवेश होईल, असे संकेतही भांबळे यांनी या वेळी बोलतांना दिले. महाविकास आघाडीच्या विचारांचा जो पारंपारिक मतदार आहे. त्यांची नावेच मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र भाजपकडून केले असून, या संदर्भात जिल्हाधिकारी यांना भेटून तक्रार केली आहे. निवेदनाची तत्काळ दखल घेत, जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना याबाबत सूचनासुद्धा केल्या. विशेषतः मुस्लिम वर्गाची नावेच मतदार यादीतून कमी केल्याचा आरोप माजी आमदार विजय भांबळे यांनी केला आहे.
जिंतूर/परभणी : भारतीय जनता पक्षाचे जिंतूर तालुकाध्यक्ष ॲड.विनोद राठोड यांनी राजीनामा देऊन माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शनिवारी, १९ ऑक्टोबररोजी जाहीर प्रवेश केला. भाजप पक्षाची ध्येयधोरणे व नेतृत्वाला कंटाळून समाजहितासाठी आपण माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्याचे ॲड.राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले. माजी आमदार भांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. ॲड.राठोड यांनी ऐन विधानसभा निवडणूकीच्या काळात भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने विद्यमान भाजप आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
शनिवारी सकाळी भांबळेच्या यांच्या निवासस्थान परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार भांबळे यांनी ही माहिती दिली. या वेळी बोलतांना भांबळे म्हणाले की; भाजपचा आयटी सेल बाहेर राज्यातील अनेक मतदारांची नावे विविध बुथवर खोटे कागदपत्र जसे आधार कार्डावर पत्त्यामध्ये खाडाखोड करून नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता नावे टाकत आहेत व जिंतूर सेलू मतदारसंघातील महाविकास आघाडीचे मतदार यांचा परस्पर सहा नंबरचा फार्म भरून अनेक लोकांची नावे मतदारसंघाच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याशी खासदार संजय जाधव यांच्या समवेत भेट घेऊन असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवेदनदेखील दिले आहे.यापुढे देखील असा प्रकार चालूच राहिला, तर जिल्हाधिकारी परभणी यांच्या दालनात लाखो मतदार घेऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी भांबळे यांनी दिला. विरोधकांनी असा मतदारांच्या हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करून रडीचा डाव खेळू नये, तर याउलट प्रत्यक्ष निवडणुकीत निवडणूक लढवावी, असे आवाहन केले आहे.
या वेळी अशोकराव चोधरी, अजयराव चोधरी, विश्वनाथ राठोड, रामराव उबाळे, बाळासाहेब भांबळे, गणेशराव ईलग, शौकत लाला, गजानन कांगणे, दलमिर पठाण, संजय निकाळजे,कैलास महाराज, विजय खिस्ते, प्रवीण चव्हाण, प्रकाश काका भांबळे, शंकर गंजे, खालेक भाई, अक्कु लाला, हकीम लाला, गंगाधर तरटे, कैलासराव सांगळे, शरदराव अंभोरे,संजयराव अंभोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.