‘यापुढे शेतमालाची हमीभावाने खरेदी’
शेतमालाबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा
नवी दिल्ली : ‘सर्व कृषी उत्पादने किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) खरेदी केली शिवराजसिंह जातील, हे आमचे चौहान सरकार सुनिश्चित करेल. ही मोदी सरकारची हमी आहे,’ असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले. ‘एमएसपी’च्या कायदेशीर हमीसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर चौहान यांनी राज्यसभेत ‘एमएसपी’ च्या मुद्द्यावर है उत्तर देताना विरोधकांना लक्ष्य केले. ‘त्यांनी सत्तेत असताना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य करू शकत नसल्याचे संसदेत अधिकृतरीत्या सांगितले होते. मात्र, २०१९ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देऊन एमएसपी मोजण्याचा निर्णय घेतला, असे चौहान म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी सरकारचरोबर बोलावे, असे कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी
शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत बोलताना स्प्ष्ट केले. शेतकऱ्यांसाठी चर्चेचे दरवाजे नेहमीच उघडे असतात. त्यांनी आम्हाला बोलावले तर आम्हीही जायला तयार आहोत, असेही ते म्हणाले. हमीभावासाठी गेले अनेक महिने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, विरोधकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
‘दहा कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी’
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या १८व्या हप्त्यांतर्गत केंद्राने सुमारे १० कोटी शेतकऱ्यांना २० ६५७ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. ही माहिती कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. पीएम-किसान योजनेंतर्गत, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीद्वारे आधार कार्डची जोडणी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक ६००० रुपयांची आर्थिक मदत हस्तांतरित केली जाते. कोणत्याही मध्यस्थाच्या सहभागाशिवाय या योजनेचा लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, यासाठी सरकार काळजी घेते असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.
Credit – MaTa