‘महाराष्ट्र बंद’ ला सेलूत उत्स्फूर्त प्रतिसाद
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
सेलू/परभणी : पोलिसांच्या अमानूष मारहाणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सेलू शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला. दरम्यान, आंबेडकरी अनुयांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शांतता मार्च काढून निवेदन सादर केले. तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांनी निवेदन स्वीकारले.
कोंबिंग ऑपरेशन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी, कलम १७६ (१A) सीआरपीसी अन्वये चौकशी सेवानिवृत्त न्यायाधिशाकडून न करता सिटींग न्यायाधिशामार्फत करण्यात यावी. सदरिल प्रकरणातील वादग्रस्त पोलीस अधिकारी अशोक घोरबांडसह इतरांवर कलम ३२ अन्वये अँट्रॉसिटी कायद्यान्वे कलम ३(१)व ३(२) प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच परभणी शहरातील पोलिस स्टेशनमधील सिसिटीव्ही जप्त करून तपासावेत.
मृत सोमनाथ सोमवंशी यांच्या कुटूुबियांना सरकारने ५० लाखाची आर्थिक मदत करून कुटूुबातील सदस्यांस शासकीय नौकरीत समावून घ्यावे. तसेच वच्छलाबाई मानवते यांना मारहाण केलेल्या पोलिसांवर ३५४, ३०७ अंतर्गत गुन्हे दाखल करून निलंबित करून मानवते यांना १० लाख रूपये आर्थिक मदत करून पुर्नवसन करावे, न्यायालयीन कोठडीतील बांधवांची न्यायाधिशासमोर रूग्णालयात तपासणी करावी, निर्दोष जखमींना मदत, संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
तसेच १० डिसेंबररोजी सकल हिंदू समाज मोर्चातील संयोजक याची चौकशी करून मोर्चातील भाषणे तपासून कारवाई करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. शहरात शांततेत मार्च काढून तहसीलदार डाँ.शिवाजी मगर यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. विधीज्ञ विष्णू ढोले, बालिशन साळवे, राणू ढोले, बापू धापसे, लताबाई नाटभजे, मीनाताई बंदुके, लक्ष्मीताई राक्षे, आशाताई बंदुके, सविता प्रधान, सविता भुजबळ, लता मगर, गिरजाबाई साळवे, अरूणा इंगळे यांच्यासह महिला, तरूण, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.