‘नूतन’ च्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप
न्यायाचा रथ चालवा : प्रसाद महाराज काष्टे
सेलू : समाजात कितीही वाईट प्रवृत्तीची लोक असली तरीही आपण आपला चांगुलपणा सोडू नये अन्यायाविरुद्ध आपण सतत लढत राहिले पाहिजे आणि आपल्या न्यायाचा रथ चालवला पाहिजे. यासाठी चांगली माणसे जोडणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सभा धीटपणा अंगीकारावा जो प्रयत्नांनी येतो, असे मत प्रसाद महाराज काष्टे यांनी व्यक्त केले. काजळी रोहिणी येथे आयोजित नूतन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप मंगळवारी झाला. त्यावेळी काष्टे महाराज बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते.
‘युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी’ हा विषय असलेले शिबिर आयोजित करण्यात आले होते. काष्टे पुढे म्हणाले की,” युवकांनी सतत आपल्या ध्येयाचा ध्यास धरावा आणि ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करावेत सातत्य आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. परीक्षेत यश मिळवण्या सोबतच एक चांगला व्यक्ती सुद्धा व्हावे असे ते म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, सरपंच भारत इंद्रोके, उपसरपंच भारत काष्टे, मुंजाभाऊ काष्टे, सचिन इंद्रोके, तसेच कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सुरेश उगले, प्राध्यापक विशाल पाटील, डॉ.कीर्ती निरालवाड, डॉ.शिवराज घुलेश्वर, महेश कुलकर्णी, डॉ. आर.जे.नाथांनी, अर्चना ठोंबरे, शुभांगी नायकल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रद्धा गिराम, आभार नंदिनी शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता रिठे, रंगनाथ सोळंके, पंकज मगर, मनोज सोळंके, पिनू पांचाळ यांनी सहकार्य केले.डॉ.राजाराम झोडगे, डॉ. राजाराम खाडप, हेमचंद्र हडसनकर, श्याम गरुड, प्रसाद पांडे, विलास खरात यांची उपस्थिती होती.