सेलू्त श्रीमद् भगवद्गीता ज्ञान महोत्सवाला प्रतिसाद
श्रेष्ठ विचाराने सकारात्मक ऊर्जा मिळते : राजयोगिनी भारतीदीदी
सेलू/परभणी : सेलू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने श्री साईबाबा मंदिरात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञान महोत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय प्रवचनकार ब्रह्माकुमारी राजयोगिनी भारतीदीदी ह्या श्रीमद् भगवद्गीता सारचे महत्त्व विशद करीत आहेत.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी भारती दीदी यांनी सांगितले की, मी कोण आहे ? म्हणजेच स्वतःला ओळखता आले, तर मन नियंत्रित होईल. बुद्धीला चालना मिळेल आणि संस्काराद्वारे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. त्यासाठी आत्मबोध, आत्मज्ञान होणे आवश्यक आहे. अहंकार, द्वेष, मत्सर आदी विकारांना दूर ठेवा. सर्वांप्रती स्नेह ठेवा, निस्वार्थ भाव, श्रेष्ठ विचार, आचाराने सकारात्मक ऊर्जा मिळते.
पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, साईराज बोराडे, चेतन लोया, राम सोमणी, आनंद सोनी, जाजू, राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कथेला सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजता महाआरतीने दुसऱ्यादिवशीच्या कथासारची सांगता झाली. या वेळी डॉ.एस.एम.लोया, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोरजी बाहेती, लता गिल्डा, रामवल्लभ बाहेती, सुधीर चौधरी, रवी अग्रवाल, मयूर मिटकरी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. रविवारी दोन फेब्रुवारी रोजी महोत्सवाची सांगता आहे. सूत्रसंचालन सीमा बहेन यांनी केले. कथेला महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.