पुण्यकर्मासाठी सुसंगती धरावी : डिगांबर महाराज नखाते
संत तुकाराम बीज निमित्त डॉ.दिगंबर घोडके परिवारातर्फे कीर्तनाचे आयोजन
सेलू जि.परभणी : करोना सारख्या महामारीतून तेच लोक वाचू शकले. ज्यांनी काही पुण्यकर्म केले आहे. त्यामुळे सुसंगती धरावी. आज बापाला पोराच्या पाया पडण्याची वेळ येत आहे, “बाबा, मी पाया पडतो पण वाईट मित्रांच्या संगतीत राहू नकोस.” असे सांगण्याची वेळ व्यावी ही बापाची हतबलता चिंताजनक आहे, त्यामुळे पुण्यकर्मासाठी सुसंगती सदा करावी. ज्याद्वारे अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकते. असे मत डिगांबर महाराज नखाते यांनी व्यक्त केले.
संत तुकाराम बीज अणि चारधाम यात्रेनिमित्त काशीबाई व तुळशीराम घोडके, डॉ.दिगंबर घोडके परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, अरबी घोडके इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक रामप्रसाद घोडके, माजी पवन अडाळकर, नगराध्यक्ष संदीप लहाने, डॉ.जनार्दन गोळेगावकर, डॉ.सुनील कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
महाराजांनी दानाचे महत्व सांगताना, अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. हाताने दान करावे, पायाने चारधाम यात्रा करावी. असे सांगून बदलत्या काळानुसार भौतिकसुविधा भरपूर आल्या. पण, त्यातून समाधान मिळत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्धव महाराज पांचाळ, केशव महाराज, रामभाऊ वाघ, बळीराम घांडगे, आसाराम महाराज,अनंतराव भुजबळ, नारायण महाराज हरकळ अभिषेक महाराज यांनी साथसंगत केली.
प्रारंभी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. ज्योती दिगंबर घोडक, अलका नरेश घोडके, रामप्रसादजी घोडके यांनी पूजन व नखाते महारांजाचा सत्कार केला. रमेशराव अस्वले, डॉ.दायमा, उत्तमराव घोडके, विकासराव घोडके, श्रीहरी घोडके, विश्वंभर घोडके, बाबाराव घोडके आदींसह गावकरी व मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने सांगता झाली.