तिरंगा रॅलीस जिंतूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग
सकाश न्यूज नेटवर्क, जिंतूर : ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला आणि बलिदानाला मानवंदना देण्यासाठी सोमवारी, १९ मेरोजी जिंतूर शहरात राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली उत्साहात काढण्यात आली. तिरंगा झेंडा हाती घेत रॅलीत सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारत माता की जय, वंदे मातरम घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सकाळी अकरा वाजता मार्केट यार्ड परिसरातून रॅलीस सुरूवात झाली. विविध स्तरातील नागरिक, राजमुद्रा अकॅडमीचे विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तीपर घोषणांनी चैतन्य फुलले होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी डॉ.पंडित दराडे, गोविंद थिटे, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, महेश चैत्यन्य महाराज, संदीप शर्मा महाराज (ईटोलीकर) व्यापारी ब्रिजगोपाल तोष्णीवाल, रमेश दरगड, प्रसाद बुधवंत, मुसाभाई कुरेशी,आत्माराम पवार, विलास भंडारे, सुनील मते, प्रदीप देशमुख, सचिन रायपत्रेवार, लक्ष्मण ईलग, रेहमान भाई, चंद्रकात बहिरट आदींनी परिश्रम घेतले.