नूतन कन्या शाळेतील रक्षाबंधनातून पर्यावरणाचा संदेश
शिक्षक, कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनी बांधल्या तिरंगा रंगातील राख्या
सेलू : येथील लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमवारी, 22 ऑगस्ट रोजी, इयत्ता आठवीच्या (ई) विद्यार्थिनींनी शिक्षक, शिक्षिकांना व कर्मचाऱ्यांना पर्यावरणपूरक तिरंगा रंगात तयार केलेल्या राखी बांधून आगळा वेगळा उपक्रम राबवला. या प्रसंगी मुख्याध्यापिका संगीता खराबे, उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, सांस्कृतिक विभागप्रमुख भालचंद्र गांजापुरकर, रेणुका अंबेकर, वर्ग शिक्षक खराटे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार कीर्ती राऊत यांनी मानले.
हेही वाचा : Spiritual : ब्रह्माकुमार डॉ.सचिन परब यांचे सेलूत आज प्रवचन