राष्ट्रीय एकता दिन : सरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारांची देशाला गरज : एस.डी.ओ.अरुणा संगेवार
सेलूतील एकता दौडला प्रतिसाद, जेष्ठ नागरिक, युवक युवतींचा मोठा सहभाग
सेलू जि.परभणी : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौड रॅलीला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी बोलताना उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार म्हणाल्या, ” आव्हानात्मक परिस्थितीत 565 संस्थानांचे विलिनीकरण करून, देशाला एकसंध करत “खंडप्राय संघराज्य ” निर्माण करण्याचे महत्वपूर्ण कार्य लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले.आजही पटेलांच्या एकात्मतेच्या विचारांची देशाला गरज आहे.”
उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने सोमवार, ३१ आक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नूतन शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, उद्योजक नंदकिशोर बाहेती, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, पर्यवेक्षक प्रा.नागेश कान्हेकर, किशोर जोशी, डॉ.विलास मोरे, गंगाधर कान्हेकर, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे, प्रा.डॉ.के.के.कदम, सुरेश काबरा, मुख्याध्यापक रामराव बोबडे, रामप्रसाद गोरे, प्रदिप कौसडीकर, रविंद्र पाठक, शरद ठाकर, पत्रकार रेवणअप्पा साळेगावकर, अरूण राऊत, प्रवीण चंदन, रौफखान पठाण, आबासाहेब लोंढे, प्रा.रामेश्वर गटकळ, पद्माकर गौंडगे, मुक्तावार, माजी सैनिक गोरखनाथ राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून “एकता दौड” ला उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. क्रांती चौक, गोविंद बाबा चौक मार्गे नगर परिषद कार्यालयासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्टेशनरोडवर छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. नूतन विद्यालयात स्वातंत्र्य सेनानी श्रीरामजी भांगडीया यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. भारत माता की जय, वंदेमातरम् या घोषणांनी रॅलीत एकात्मतेचे चैतन्य निर्माण केले. व्यायामाचे व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी नियमित धावणे, चालणे, फिरणे यासाठी एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिकारी व जेष्ठ नागरिक, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक यांच्यासह गटकळ करीअर अकॅडमीचे २०० खेळाडू एकता दौड मध्ये धावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर विरेश कडगे यांनी आभार मानले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे रावसाहेब पदमपल्ले, रंजीत बारडकर, रंगरेज अन्सारी, रामा गायकवाड, अरूण रामपूरकर यांनी परीश्रम घेतले.