विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है…

विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है...

सेलू शहर विकासाची धमक आणि ध्येय बाळगणारे कार्यप्रवण नेतृत्व

सेलू शहराचे शिल्पकार दलितमित्र श्रीरामजी भांगडिया यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शहर विकासाची एक धमक आणि ध्येय बाळगणार्‍या नगराध्यक्षांपैकी पुढे आलेले एक नाव म्हणजे विनोद हरिभाऊकाका बोराडे. प्रबळ इच्छाशक्ती, नियोजनशुद्धता, कमालीचे संघटन चातुर्य, चौफरता, प्रासंगिकता, सांस्कृतिकता, आदारातिथ्यता, सहनशीलता आदी अनेकविध गुणवैशिष्ट्यांची साथसोबत करीत विनोद बोराडे हे सेलू शहराच्या सार्वजनिक क्षेत्रात पाय रोवून उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त…

https://sakashnews.com/?p=4343

Authored By Babasaheb Helaskar, Sailu

केवळ सावर्जिनक क्षेत्रात नेतृत्व करण्याच्या जिद्दीने श्री.बोराडे यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी शास्त्रीनगर वार्डातून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. दिलदारपणा, मोकळा स्वभाव, प्रत्येकाच्या अडअडचणीला धावून जाण्याचे माणूसपण आणि जबरदस्त निर्णयक्षमता याच्या जोरावर सेलू शहराच्या राजकारण आणि समाजकारणात श्री.बोराडे यांनी आपली स्वतंत्र ओळख आणि वलय निर्माण केले. समाजाच्या सर्वघटकात विश्वासू आणि निष्ठावान कार्यकत्यांचे जाळे निर्माण करण्यातही ते सदा पुढे राहिले. राजकारण आणि समाजकारण आणि पक्ष संघटनांतील अनुभवी जेष्ठांचे आशीर्वाद, मार्गदर्शन विनम्रपणे स्वीकारणे, त्यांना आदर देणे आणि त्या बरहुकूम कार्यसातत्य राखण्याचे कसब श्री.बोराडे यांनी विकसित केले आहे. राजकारणात कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतो यांची जाणीव त्यांना आहे. यामुळेच नवनवीन तरुण कार्यकर्ते आणि मित्रपरिवारही जोडण्याचा त्यांचा स्वभाव लाजजबाब म्हणावा लागेल. हीच शिदोरी त्यांच्या कार्यक्षेत्राची वाटचाल आनंददायक करीत आली आहे.

विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है...

डिसेंबर १९९९ मध्ये श्रीमती विमलताई राजूरकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात शेवटच्या सहा महिन्यांसाठीच श्री बोराडे यांना प्रभारी नगराध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. हा सहा महिन्याचा काळ विनोद बोराडे यांच्यासाठी खऱ्या अर्थाने राजकीय पटलावरचा टर्निंग पॉंईट ठरला. या सहा महिन्यांत झटपट निर्णयातून मूलभूत सोयीसुविधांचे कामे पूर्ण करण्याचा विडा त्यांनी उचलला. आणि कामाची चूणूक दाखविणारे श्री बोराडे पुढे दोन वेळा झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणूकीत विक्रमी मताने विजयी झाले. विकासाचे एक ध्येय बाळगून कोट्यवधीची विकास कामे उभी केली आणि शहरवासियांच्या हृदयात एक वेगळे स्थान आणि तरूणांईत जादुई क्रेझ ते निर्माण करू शकले. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि कार्यकर्त्यांचा वेळोवेळी सन्मान राखल्याने सेलू पालिकेवर ते निर्विवाद वर्चस्व गाजवू लागले. २०११ मध्ये थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक नव्हती, नगरसेवकातून नगराध्यक्ष निवड असल्याने राजकीय डावपेचात त्यांचा टिकाव लागला नाही. पवन आडळकर हे नगराध्यक्ष झाले. पाच वर्ष शांत राहिलेल्या विनोद बोराडे यांनी २०१६ मध्ये जनशक्ती विकास आघाडी स्थापन करून स्वबळावर थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आघाडीची सत्ता स्थापन केली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी वेगळी वाट धरली. पण सर्वसामान्य सेलूकरांना ते रूचले नाही. परत ते आघाडी आणि कॉंग्रेसपर्यंत येऊन पोहचले.

विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है...

मूलभूत सुविधा देणे हे कर्तव्य समजून, त्याही पेक्षा वेगळे काही करण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. विविध कार्यातून शहराची सांस्कृतिक, सामाजिक आणि विधायक परंपरा जपण्यासाठी श्री.बोराडे यांचे नेहमीच प्रयत्न असतात. सेलूभूषण पुरस्कार, गुणगौरव सोहळा, नगराध्यक्ष परिषद, महिला मेळावे, पालिकेचा सुवर्ण महोत्सव, वृक्षारोपण अभियान, विविध शिबीरे, रावणदहन व श्री साई नाट्य मंदिराची उभारणी, श्री साई महोत्सव, महिला कीर्तन महोत्सव, आदी वैशिष्टयपूर्ण उपक्रमातून सेलूचे नाव सतत चर्चेत ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. श्री.बोराडे यांनी कोट्यवधीचा विकासनिधी वळवून शहरात केलेल्या कामांची यादी मोठी आहे. व्यायामशाळा, रेल्वभुयारी पुलासाठी सहकार्य, महिलांसाठी ओपन जिम, स्वच्छतेसाठी घंटागाडी, हायमास्ट दीवे, डास निर्मलूनसाठी फवारे आदी काही कामांचा उल्लेखही करता येईल. सेलू शहराचा भीषण पाणी टंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन निम्न दुधना प्रकल्पावर आधारित वीस कोटीची सुधारित पाणी पुरवठा योजनेचे काम बोराडेंनी पूर्णत्वास नेले. योजना कार्यान्वित व्हायला वेळ लागला. पंरतु दूरदृष्टी ठेवून श्री.बोराडे यांनी या योजनेसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे सेलूवासियांना पाण्याची कमतरता भासेनाशी झाली. बोराडे यांचे हे काम सेलूकरांच्या कायम स्मरणात राहणारे आहे. शहराला पाणी कमी पडू नये म्हणून दरम्यानच्या काळातील पिंपरीची तातडीची योजनाही कार्यान्वित करून तीनही योजनेतील पाणी शहराकडे वळविता आले. याच बरोबर श्री साई मंदिर विकास, श्री साई नाट्य मंदिर सारखे शहराच्या विविध भागात झालेली समाज मंदिराची कामे, शांतीधाम स्मशान भूमीची वैशिष्ट्यपूर्ण विकास आदी  कामे शहराच्या वैभवात भर घालणारी आहेत. पालिका इमारतीचे नूतनीकरण, सर्व सोयीसुविधानियुक्त कार्यालय, अग्निशमनदल युनिटालाही मंजुरी मिळवून काम पूर्ण झाले. त्यामुळे शहरासह परिसरातील आगीच्या घटना तातडीने नियंत्रित करता येणे सुकर झाले. करोनामुळे दोन वर्ष सर्व काही ठप्प होते. त्यामुळे बोराडेंच्या या काळात निधी अभावी बऱ्याच योजना रेंगाळल्या. पुढे राज्यातील सत्तांतरणाचाही फटका बसला असला तरी करोना महामारीत बोराडेंच्या नेतृत्वात नगरपालिका प्रशासनाने केलेले कार्य अविस्मरणीय ठरले आहे. जलशुध्दीकरण प्रकल्पाजवळ पाच एकरमध्ये उद्यान फुलविणे, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, वस्ती, वसाहती तेथे पक्के रस्ते , जलनि:सारणाची कामे, महत्त्वपूर्ण अशी अंडरग्राऊंड ड्रिनेज व्यवस्था, शहरातील रस्त्यांचे सिमेंट क्रॉंकिटीकरण, रूंदीकरण, खड्डे मुक्त शहर, सुरक्षित, स्वच्छ, सुंदर आणि हरित सेलू शहर असा नावलौकिक शहराला प्राप्त करून देण्यासाठी श्री.बोराडे यांची धडपड सुरूच आहे. सामुहिक प्रयत्नाची त्याला जोड मिळाली पाहिजे. शहर व परिसरात नवे नवे प्रकल्प आले पाहिजेत, उद्योग, व्यवसाय, रोजगार वाढला पाहिजे. बाजारात भांडवल खेळते राहीले पाहिजे, यामध्ये नगरपालिकेतील नेतृत्वही प्रभावी हवे. हीच प्रभाविता आगामी काऴात वाढविण्याची गरज आहे.

विनोद बोराडे : सिर्फ नाम ही काफी है...

मध्यंतरी पाचेक वर्षाचा काळ सोडला, तर विनोद बोराडे हे वीसेक वर्षांपासून पालिकेवर अधिराज्य गाजवत आले आहेत. राज्यातील सत्ताकारणासोबत आता शहरातील सामाजिक, राजकीय संदर्भ बदलले आहेत. या पार्श्वभूमीवर नव नवे चेहरे आगामी पालिका निवडणुकीत प्रबळ लढतीच्या तयारीत आहेत. नगराध्यक्षपदासाठी सर्वांचा मुकाबला थेट बोराडेंशीच असणार आहे. राजकीय समीकरणे कशी जुळतात, की बदलतात हे येणारा काळच ठरवेल. राजकारणात सत्तेचे परिवर्तन होत राहाते; पण सत्तेतील व्यक्ती परिवर्तनासाठीच्या लढाईचे भ्रमित चित्र कायम स्पष्ट राहात नाही. २०१६ मध्ये थेट निवडणुकीत पवन आडळकर यांनी बोराडेंना तुल्यबळ लढत दिली होती. ही लढत दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही.  आडळकर किंवा त्याऐवजी आणखी कोणी नवा चेहरा मैदानात उतरेल. नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक विनोद बोराडे यांना आजवर लकीच ठरत आली, हे सर्वांनीच अनुभवलेले आहे. आगामी निवडणूकही थेट जनतेतून आहे. पण, प्रत्येकवेळी भाग्य साथ देतेच असे नाही. त्यासाठी श्रद्धेला कृतीची आणि परिश्रमाची जोड देणे क्रमप्राप्त आहे. बोराडे नक्कीच अधिक कष्ट घेतील. हे मात्र निश्चित खरे. शेवटी नाराजांना आवरणे आणि आराजांना सन्मान देणे या बाबींना निर्णायक महत्त्व असते. हेच बहुंशी राजकारण असते. म्हणून आगामी निवडणुकीत ‘विनोद बोराडे – सिर्फ नाम ही काफी है’ याला छेद देण्यासाठी आखल्या जाणाऱ्या राजकीय डावपेचांशी खुद्द बोराडे कसा मुकाबला करतात, हा अनुभव सर्वांसाठी औत्सुक्याचा ठरणार आहे. तुर्त विनोद बोराडे यांना वाढदिवसाच्यानिमित्ताने भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! त्यांना उदंड दीर्घआयुर्रोग्य लाभो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

केवळ राजकीयदृष्ट्या सेलू शहरापुरते लक्षात घेतले, तर पहिले नगराध्यक्ष श्रीरामजी भांगडिया , त्यानंतर ॲड. वसंतराव खारकर, हेमंतराव आडळकर आणि पुढे विनोद बोराडे ही नावे कायम  नगराध्यक्ष म्हणून सेलूकरांच्या लक्षात राहणारी आहेत. शहराला विकासात पुढेपुढे घेऊन जाणारी ही कर्तृत्ववान माणसे लौकिकप्राप्त ठरलेली आहेत.

नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक विनोद बोराडे यांना आजवर लकीच ठरत आली. आगामी निवडणूकही थेट जनतेतून आहे. पण, प्रत्येकवेळी भाग्य साथ देतेच असे नाही. श्रद्धेला कृतीची, संकल्पाला सिद्धीची आणि परिश्रमाची जोड देणे क्रमप्राप्त आहे. बोराडे नक्कीच अधिक कष्ट घेतील. हे मात्र निश्चित खरे. शेवटी नाराजांना आवरणे आणि आराजांना सन्मान देणे या बाबींना सार्वत्रिक निर्णायक महत्त्व असते. हवा होते. केलीही जाते. कधी कधी वावटळीप्रमाणे भूर्रकून उडून जाते. त्यात नवेप्रवाह, नवे विचार , नवे प्रयोग होणेही साहाजिक असते ; पण दांडगा आत्मविश्वास, खंबीर मनाची सजगता, अर्थ आणि बुद्धीची सकारण उपयोगिता सिद्धीला जाते. म्हणूनच आगामी निवडणुकीत ‘विनोद बोराडे – सिर्फ नाम ही काफी है’ याला छेद देण्यासाठी आखल्या जाणाऱ्या राजकीय डावपेचांशी विनोद बोराडे कसा सामना करतात, हे सर्वांसाठी औत्सुक्याचे आणि तितेकच सर्वांना सकाश देणारे ठरणार आहे. तुर्त विनोद बोराडे यांना वाढदिवसाच्यानिमित्ताने भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! त्यांना उदंड दीर्घआयुर्रोग्य लाभो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!