ISRO : ‘झेडपी’च्या २७ विद्यार्थ्यांची इस्रोवारी; सेलूतील तिघांना संधी
श्रीहरिकोटातील उपग्रह प्रक्षेपण अनुभवणार, आयुक्त सुनील केंद्रेकर यांची संकल्पना
सेलू / परभणी : उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव आणि यंत्रणेचा अभ्यास व्हावा, यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील पाचवी ते आठवीच्या २७ विद्यार्थ्यांची सहल अंतरीक्ष केंद्र, श्रीहरीकोटाकडे मंगळवारी (१६ मे) रवाना झाली. हैदराबाद येथून या विद्यार्थ्यांची विमानवारी सुरू होणार आहे. यामध्ये सेलू तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची या सहलीसाठी १० मार्च रोजी केंद्र, तालुका आणि जिल्हा अशा तीन स्तरांवर परीक्षा घेण्यात आली होती. जिल्हा शिक्षण विभागाने परिक्षेचे आयोजन केले. निकालानंतर परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपणाचा तसेच थुंबा येथील स्पेस म्युझियम,विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. सीईओ विनय मून,प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर, अजिंक्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. १६ विद्यार्थ्यिनी ११ विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ३५ जणांचा समावेश आहे. यामध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे , श्रीपाद देशपांडे, गजानन वाघमारे , सुधीर सोनुनकर, डॉ.कोमल शिंदे, सारिका गिरी, पद्मजा गोरे यांचा समावेश आहे. डाॅ. संदीप घोंशिकर यांनी बसला हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी डॉ.रामेश्वर नाईक, शिरीष लोहट, शेख अंसारी, पालक, शिक्षकांची उपस्थिती होती.
सहभागी विद्यार्थी : जिंतूर : शुभम गायकवाड, वैष्णवी शेळके, कार्तिकी ठोंबरे, सेलू : स्नेहल गजमल, अनंत मांगदरे, वेदिका रासवे, गंगाखेड : पूनम मोटे, राधा वरकडे, अंकिता मोटे, मानवत : ज्ञानेश्वर मस्के, तेजस भिसे, ऋतुजा शेळके, पालम : दिव्या पोळ, शशिकांत खेडकर, भक्ती पोळ. परभणी : यशराज कच्छवे, श्रीनिवास रेंगे, प्रिया रेंगे, पाथरी : आरुषी कोरडे, अथर्व वऱ्हाडे, प्रगती राऊत, पूर्णा : दिव्या शिराळे, पवन सलगर, विद्या पौळ, सोनपेठ : विवेक धबडे, गोपाळ पवार, रुद्राणी राजमाने
Antarbharati : द्वेषाचे वातावरण निवळावे; गांधीवादी विचारवंत आशा बोथरा यांचे मत