श्रीराम प्रतिष्ठानमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात 

श्रीराम प्रतिष्ठानमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात 

चिमुकल्यांनी सादर केली देशभक्तीपर गीते

सेलू : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येथील श्रीराम प्रतिष्ठान विद्याविहार शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर ध्वजारोहनाचा कार्यक्रम रविवार,१७ सप्टेंबररोजी उत्साहात  पार पडला. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ज्ञानतीर्थ विद्यालयात संस्थेचे सदस्य डॉ.आदित्य रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व प्रॉस्परस पब्लीक स्कुल येथे संस्थेच्या सदस्या डॉ.अपूर्वा रोडगे-पारवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.रामराव रोडगे, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे व सर्व घटक संस्थेतील प्राचार्य डॉ.निलीमा सिंह, डॉ. बबन सोनवणे, डॉ.मिनाक्षी रत्नपारखी, प्रा.अशोक बोडखे, प्रगती क्षीरसागर,  कार्तीक रत्नाला,  शालीनी शेळके, करणसिंग चव्हाण, अक्षय बन आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्वाचा दिवस आहे. दरवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जातो. १९४८ मध्ये या दिवशी मराठवाडयातील निजामांची सत्ता संपुष्ठात आली आणि मराठवाडा भारताचा भाग बनला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानामध्ये विखुरलेला होता. त्यावेळेच्या ५६५ पैकी ५६२ संस्थानानी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैद्राबाद संस्थान, जम्मू आणि कश्मीर आणि जुनागड ही संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैद्राबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निजाम सरकाराचे राज्य होते. निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेत्रत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्तिसंग्राम सुरु झाला. अखेर१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडयाला निजामापासून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे हा दिवस मराठवाडयातील जनतेसाठी अत्यंत महत्वाचा व आनंदाचा आहे, असे यावेळी बोलतांना डॉ. आदित्य रोडगे म्हणाले. याप्रसंगी प्रिन्स इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. सूत्रसंचालन संजय ठाकर, कल्पना भाबट यांनी केले.


परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : मंत्री अतुल सावे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!