Surabhi Mahotsav : ‘महाराष्ट्राची लोकधारा’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध; सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचा सुरभी महोत्सव
डॉ.संजय रोडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर घडलेला बदल आपणास पाहावयास मिळत आहे. शासनाच्या या योजनांतून विद्यार्थ्यांना उच्चदर्जाच्या सुविधा देणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. सर्व पालकांच्या सहकार्यामुळेच शक्य आहे. विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी व्हावेत हेच माझे खरे स्वप्न आहे. ते पूर्ण होईल.
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवा अंतर्गत एलकेआरआर प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या निवासी योजनेअंतर्गत प्रवेशित एकात्मिक अदिवासी प्रकल्प व धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम २९ डिसेंबररोजी साई नाट्यमंदिर येथे पार पडला. कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन निरीक्षक समाज कल्याण विभागाचे परभणी जिल्हा निरीक्षक टी.डी.भरड, किशोर कटारे,नाथा रोडे, काशीराम सोनुले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांची उपस्थिती होती.कैलास पवार ,दादासाहेब बोंबले प्रभाकरराव गजमल, प्रकाश गजमल, संजय गटकळ, रुस्तुम कुरडे, किशोर कारके, श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य प्रगती क्षीरसागर, कार्तिक रत्नाला आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.यावेळी बालकलाकारंनी आदिवासी गीत, नमन गीत, जगदंब गीत,उगवली शुक्राची चांदणी,लावणी, विनोदी नाटिका असे अनेक कला प्रकार सादर करून रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली. सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले.
कोण, काय म्हणाले…
डॉ.संजय रोडगे यांनी जो शैक्षणिक प्रवाह निर्माण केलेला आहे. त्यामध्ये अदिवासी व धनगर समाजातील विध्यार्थ्यासाठी खूप चांगली मेहनत घेत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत नामांकित शाळामध्ये शाळेचे उलेखनीय कार्य समोर आलेले आहे – किशोर कटारे, पत्रकार
अदिवासी विध्यार्थी हे डोंगरात ,रानावनात रहाणारे असल्यामुळे त्यांच्या अंगात कटकता,धाडस हे नैसर्गिक गुण आत्मसात आहेत. त्याच गुणांना आकार देण्याचे काम डॉ.संजय रोडगे करत आहेत. रुस्तुम कुरुडे, जिल्हाध्यक्ष आदिवासी संघटना
डॉ.संजय रोडगे धनगर समाजातील विद्यार्थ्यांची जडणघडण करत आहेत. ही उलेखनीय बाब आहे- नाथा रोडे