Cotton Market :कापूस बाजारात मापात घोळ : आर्थिक लुटीने शेतकऱ्यांतून संताप, सेलूतील वजन वैधमापनचे अधिकारी झोपेत

Cotton Market :कापूस बाजारात मापात घोळ : आर्थिक लुटीने शेतकऱ्यांतून संताप, सेलूतील वजन वैधमापनचे अधिकारी झोपेत

 

परभणी : सेलूतील दोन वेगवेगळ्या वजन काट्यावर एकाच कापसाने भरलेल्या वाहनाच्या वजनात कमालीची तफावत आढळून येत आहे. कापूस बाजारात मापात घोळ होत असल्याने आर्थिक लुटीने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहेत वजन वैधमापनचे अधिकारी झोपेत आहेत. असा आरोप होत आहे. याद्वारे खरेदीदार आणि वजन काटेधारक संगणमताने शेतकऱ्यांची हजारोची आर्थिक लुट करीत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप संतापाच्या भावना आहेत, दरम्यान, हा प्रकार सर्वत्रच वजनकाट्यावर सुरू आहे का ? यावरूनही चर्चा सुरू झाली आहे.

सेलूमध्ये पणन व वस्त्रोद्योग विभागांतर्गत सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती व अन्य दोन खाजगी बाजार समिती तसेच काही खाजगी खरेदीदारांकडून कापूस खरेदी केली जात आहे. परभणीसह, बुलढाणा, बीड, जालना आदी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी सेलूतील बाजारपेठेत मोठ्याप्रमाणावर कापूस विक्रीस आणीत आहेत. अकरा कापूस जिनिंग प्रेसिंग उद्योग सुरू आहेत. त्यामुळे दररोज शेकडो क्विंटल कापूस खरेदी विक्रीची उलाढाल आहे. शुक्रवारी, ५ जानेवारीला पाटोदा (ता.मंठा जि.जालना) येथील शेतकरी पांडुरंग बोराडे यांनी कापूस विक्रीस आणला होता. मंठा रोडवरील श्री माऊली कृपा वजन काट्यावर त्यांनी कापसाच्या वाहनाचे वजन केले. तेव्हा निव्वळ कापसाचे वजन ३१ क्विंटल २० किलो भरले. मात्र, आणलेल्या कापसाचे अपेक्षित वजन भरले नाही. त्यामुळे बोराडे यांनी समर्थ ॲग्रो इंडस्ट्रीजच्या वजन काट्यावर वजन केले. तेव्हा निव्वळ कापसाचे वजन ३१ क्विंटल ४५ किलो भरले. दोन्ही वजनात २५ किलोचा फरक आढळून आला. त्यामुळे शहरातील वजन काट्यावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचे उघड झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वजनातील तफावतीमुळे नेमके कोणत्या वजन काट्यावरील वजन ग्राह्य धरून कापूस विक्री करावा, असाही संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. दरम्यान, वजन व मापाची नियमित तपासणी करण्याकडे संबंधित प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. वजन वैधमापनचे अधिकारी झोपेत असल्याचे सोंग घेत असल्याची चर्चा आहे. शेतात वेढा केल्याचे सोंग वैधमापनचे अधिकारी घेत असल्याची टीका होत आहे.

मापातील फरकामुळे होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी व सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

श्री माऊली कृपा वजन काट्यावर अपेक्षेप्रमाणे कापसाचे वजन भरले नाही. त्यामुळे समर्थ ॲग्रोच्या काट्यावर वजन केले. दोन्ही काटयात २५ किलोची तफावत आढळून आली. हा फरक म्हणजे शेतकऱ्यांची निव्वळ लूट आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. – पांडुरंग बोराडे, शेतकरी, पाटोदा जि.जालना

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!