सय्यद शाह तुराबुल हक ऊर्स : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
परभणीत शांतता समितीची बैठकीत
परभणी, दि.२२ : सय्यद शाह तुराबुल हक येथे एक फेब्रुवारीपासून ऊर्स भरणार असून, या ऊर्स काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी गावडे बोलत होते. यावेळी खासदार श्रीमती फौजिया खान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, प्रादेशिक वक्फ बोर्ड अधिकारी खुसरो खान, जिल्हा वक्फ बोर्ड अधिकारी सय्यद अमिनुज्जमा यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ऊर्सकाळात येथे येणाऱ्या अनुयायांना पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, सोयीसुविधांबाबतची माहिती देणारे फलक जागोजागी दर्शनी भागात लावणे, दुकानांचे परवाने सहज मिळावेत, यासाठी येथे संबंधित विभागांची तात्पुरती सुविधा उपलब्ध करुन देणे, मदत केंद्राचे भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी क्रमांक दर्शनी भागात लावण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी दिले. या काळात विविध परिसरातून संदल निघतात यामध्ये उंटाचा वापर करण्यात येतो या प्राण्यांची पशुवैद्यकीय विभागाच्या अधिका-यांनी तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच शहरातील विविध भागातून येणा-या यात्रेकरू अनुयायांच्या प्रवासासाठी एसटी बसेस पुरविणे, अग्निशमन यंत्रणेच्या अधिका-यांकडून यात्रा काळात करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन त्यानुसार दुकानांची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी आयोजकांना दिले.
वक्फ बोर्डाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यावसायिक आणि जिल्हा व पोलिस यंत्रणेसोबत योग्य समन्वयन ठेवून यात्रा काळात यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आयोजकांना केले आहे.
ऊर्स यात्रा काळात महावितरणकडून विद्युत यंत्रणा चोख ठेवणे आ%