मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान : वालूरची नखाते आश्रमशाळा जिल्ह्यात तिसरी; तीन लाखांच्या पुरस्कारसाठी ठरली पात्र

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान : वालूरची नखाते आश्रमशाळा जिल्ह्यात तिसरी; तीन लाखांच्या पुरस्कारसाठी ठरली पात्र

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा अभियान : वालूरची नखाते आश्रमशाळा जिल्ह्यात तिसरी; तीन लाखांच्या पुरस्कारसाठी ठरली पात्र

सेलू जि.परभणी : राज्य शासनाकडून शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा या अभियानात सेलू तालूक्यात खाजगी संस्था गटातून प्रथम आलेल्या श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालूरने उंच भरारी कायम ठेवत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकाला आहे. शाळा तीन लाखांच्या पारितोषिकासाठी पात्र ठरली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान संस्थाध्यक्ष अनिल नखाते, सचिव भावना नखाते यांचे मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक शाम मचाले, प्राचार्य रमेश नखाते, समन्वयक रेवणअप्पा साळेगावकर यांचे सनियंत्रणात सर्व शिक्षकांनी १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत विद्यार्थी गुणवत्ता, वैयक्तिक व सार्वजनिक स्वछता, आरोग्य ,भौतिक सुविधा, पर्यावरण संवर्धन,राष्ट्रीय एकात्मता, शाळा व्यवस्थापन समीती,माजी विद्यार्थी व पालक यांच्या समन्वयातून अनेकाविध उपक्रम राबविले. गटशिक्षणाधिकारी ऊमेश राऊत, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, मुख्याध्यापक भुजंग थोरे यांचे तालुकास्तरीय पथकाच्या मूल्यांकनात श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालूरचा खाजगी संस्था गटातून पहिला क्रमांक येऊन ३ लाखांच्या बक्षीसास ही आश्रमशाळा पात्र ठरली. याशिवाय जिल्हास्तरीय स्पर्धेसाठीही सहभागी झाली. बुधवारी जिल्हास्तरीय मूल्यांकन समीतीतील गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी बी.व्ही.कापसीकर, तालुका समन्वयक जनार्दन कदम, अरूण राऊत यांनी मूल्यांकन केले तर त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी विनय मून, प्राथमिक शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, डाएटचे प्राचार्य विकास सलगर,जिल्हा समन्वयक गणराज यरमळ, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, डॉ.प्रल्हाद खुणे यांचे पथकाने शनिवारी क्रॉस तपासणी करून मूल्यांकन केले. जिल्हास्तरीय निकालात श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळेची खाजगी संस्था गटातून तिसऱ्या क्रमांकासाठी निवड झाली आणि ३ लाखाच्या बक्षीसास आश्रमशाळा पात्र ठरली. अभियान यशस्वीतेसाठी संचालक अजिंक्य नखाते, मुख्याध्यापक शाम मचाले, प्राचार्य रमेश नखाते, उपमुख्याध्यापक संजय वाशिंबे, समन्वयक रेवणअप्पा साळेगावकर, उध्दव झिंजान, प्रसाद ढोकर, पाराजी जाधव, वंदना चौधरी, राजेंद्र पाटोळे, महेश राऊत, दत्तात्रय खोमणे, गणेश रेडेवाड, निलेश गडम, मीना फंड, योगेश गिराम, महेंद्र कदम, भारत दरफडे, सुरेश ढोले व वसतीगृह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!