पालकांनो, मुलांच्या भवितव्यासाठी मोबाईलचा अतिवापर टाळा : मंगल जोगदंड; ‘नूतन’च्या बालवाड्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
सेलू जि.परभणी : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन प्राथमिक विभागाचे बालवाडीचे दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या वेळी मार्गदर्शन करतांना प्रमुख पाहुण्या मंगल जोगदंड म्हणाल्या की; पालकांनी विद्यार्थ्यांच्या विकासात अडसर ठरणारा नकारात्मक शब्दांचा वापर टाळायला हवा. राग लहान बालकावर काढू नये. भावनांना विचाराची सांगड घालायला हवी. पालकांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा त्यासाठीच मोबाईलचा वापर मर्यादित स्वरूपात व्हायला हवा . बालकांना मोबाईल पासून दूर ठेवायला हवे.
अध्यक्षस्थानी बालवाडी समितीचे अध्यक्ष राजेश गुप्ता होते. मंचावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्ही.के.कोठेकर, मकरंद दिग्रसकर, मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे ,समन्वयक अनिल रत्नपारखी, रमेश काळे, पर्यवेक्षिकाछाया रमेश बोबडे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष दिपाली बोरुळ यांची उपस्थिती होती. जोगदंड म्हणाल्या की; बालमनावर उत्तम संस्कार होणे गरजेचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांविषयी नकारात्मक शब्दांचा वापर टाळायला हवा, तो त्यांच्या विकासात अडसर ठरू शकतो. पालकांना आपला राग लहान बालकावर काढू नये. भावनांना विचाराची सांगड घालायला हवी. पालकांनी मुलांसाठी वेळ द्यायला हवा त्यासाठीच मोबाईलचा वापर मर्यादित स्वरूपात व्हायला हवा. बालकांना मोबाईल पासून दूर ठेवायला हवे. त्यांच्यात इतर कलागुण, क्रीडा ,कौशल्य विषयक आवड निर्माण करायला हवी. मी पण या संस्थेची माजी विद्यार्थिनी आहे .संस्थेतील शैक्षणिक जडणघडण हीच माझी शिदोरी आहे.स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले .महिला पालकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत यशस्वी महिलांना पारितोषिक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले .सांस्कृतिक कार्यक्रमात बालकलाकारांनी वैयक्तिक व सामूहिक नृत्याचे सादरीकरण केले व उपस्थितांची मने जिंकली.संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्ही.के.कोठेकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश गुप्ता यांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करून बालकांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक छाया रमेश बोबडे यांनी केले.संध्या कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले.पाहुण्यांचा परिचय मनीषा ठाकूर यांनी दिला. लहान बालकांनी बजाओ ढोल हे गीत सअभिनय सादर केले.सूत्रसंचालन सुनिता देवकर, अनुपमा पवार यांनी केले .मनीषा ठाकूर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रल्हाद पवार, राधा ताठे, रेणूका गात ,भक्ती भांडवले, आशा पवार यांनी परिश्रम घेतले.