उष्माघात : नागरिकांनी स्वतःचा बचाव करावा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आवाहन

उष्माघात : नागरिकांनी स्वतःचा बचाव करावा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आवाहन

उष्माघात : काय करावे; काय करू नये 

प्रतिनिधी, परभणी : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. 

♦काय करावे 

1) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टि.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.

2) तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.

3) हलकी, पातळ व सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.

4) जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

5) शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.

6) अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

7) गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

8) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.

9) पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

10) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

11) सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.

12) पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.

13) गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

♦काय करू नये

1) लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

2) दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

3) बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. तसेच दुपारी 12.00 ते 4.00 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.

4) उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. (तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.)

5) शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय इत्यादींचा वापर टाळावा.

6) शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने (Proteins) असलेले अन्न टाळावे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!