उष्माघाताने भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू; कातनेश्वर येथील घटना
परभणी : परभणी जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे उष्माघाताने एका ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच याच तालुक्यातील कातनेश्वर येथे शनिवारी (११ मे) दुपारी अडीचच्या सुमारास ५५ वर्षाच्या शेतकर्याचा बाजारात भाजीपाला विकत असताना उष्माघाताने मृत्यू झाला आहे. या मृत्यूची नोंद पूर्णा येथील ग्रामीण रूग्णालयात करण्यात आली आहे. भानुदास मुंजाजी चापके (वय ५५ रा.कातनेश्वर ता.पूर्णा ) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.