भोगाव येथे नृसिंह जयंती उत्सव साजरा; तरूणाईचा पुढाकार
परभणी : नरहरी शामराज की जय या जयघोषामध्ये गुलालाची उधळण करत युवक व गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये भोगाव येथील नृसिंह मंदिरामध्ये २१ मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नृसिंह जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाविकांच्या उपस्थितीत विष्णुसहस्त्रनामाचे पठण करण्यात आले. नृसिंह जयंती निमित्ताने अभिषेक व पूजा यावेळी करण्यात आली. यावर्षी श्री च्या अभिषेकाचा मान मंदिर समितीचे अध्यक्ष सचिन मोरे यांना मिळाला. तर महाआरती ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूरचे प्राचार्य श्री.भोंबे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. भोगाव येथील तरुणाईच्या पुढाकारातून या ठिकाणी भजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी परभणी जिल्हा बाराव संवर्धन व जतन या कार्यात सदैव अग्रेसर असलेले मल्हारीकांत देशमुख , ताई महाविद्यालय जिंतूर चे प्राचार्य श्री. भोंबे, नागेश जोशी, डॉ.दीपक देशमुख व झाड फाउंडेशनचे गजानन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. सतत वाढणारे ऊन व परिस्थिती पाहता वृक्षरोपण संवर्धन व जतनाचे अनमोल कार्य तरुण पिढीने हाती घेऊन त्यांचे संगोपन,संवर्धन व जतन करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन यावेळी मल्हारीकांत देशमुख यांनी बोलताना केले.
तर तरुणाईने परिसरात केलेल्या स्वच्छतेचे कौतुक करताना या वाढत्या रखरखत्या उन्हामध्ये संतांनी दिलेली “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” ही शिकवण अंगीकारण्याची गरज असल्याचे सांगितले. तरुणाईने केलेल्या कार्याची दखल घेत या सर्वांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री भोंबे यांनी दिली. या नृसिंह जयंतीच्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन गोविंद राठी आणि गावकरी मंडळी तसेच भजनी मंडळी सोबत सचिन देशमुख, नितीनराव मोरे, दीपकराव मोरे, किरणराव मोरे, शंकरराव देशमुख, वेदांत जाधव, आस्तिक सूर्यवंशी, गजानन हारकळ, प्रशांत मोरे, सोहम राऊत, कमलाकर मोरे, केदार देशमुख, प्रकाश देशमुख, अल्केश सूर्यवंशी, गोविंद जगताप, गोपाळ मोरे, गणेश मेंगुने, नीलकंठ मोरे, नंदकुमार वैद्य, बालाजी पुंजारे, शैलेश शेवाळे, जगन बोबडे, संतोष कुकडे, प्रणव मोरे, रितेश देशमुख, भगवानराव देशमुख, माणिक पिसाळ, गोविंद राठी, सुशील जगताप, आदिनाथ मोरे, ओमकार मोरे, ओमा साखरे, अनिरुध्द पूंजारे, ज्ञानदेव पुंजारे आदींनी पुढाकार घेतला.