मुख्यमंत्री ग्रामसडक योजना : सांवगीकरांचा रस्त्यासाठीचा वनवास संपला; २५६ कोटींच्या पुल, रस्ते कामास सुरुवात
आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा पुढाकार
सेलू : मागील ७० वर्षापासून रस्त्यासाठी सावंगी (पीसी)येथील नागरीकांचे हाल होत असतांना, आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २५६ कोटी रूपयाचा निधी खैरी-सावंगीला जोडणार्या रस्ते व पुल बांधकामासाठी मंजूर झाला. या पुल व रस्ते कामाचा शुभारंभ शनिवारी, १ जून रोजी झाला आहे. यामुळे सावंगीकरांचा ७० वर्षांपासूनचा रस्त्यासाठीचा वनवास संपला आहे.
उद्घाटनप्रसंगी डॉ.संजय रोडगे, दिनकर वाघ, ॲड.दत्तराव कदम, माऊली ताठे, दिनकर पडघन, अनिल पवार, गणेश काटकर, सुंदर गाडेकर, भारत इंद्रोके, मयूर वाघ, भागवत दळवे, बाळू आघाव, नारायण ताठे, प्रकाश ताठे, लक्ष्मण ताठे आदींची उपस्थिती होती. मागील ७० वर्षापासून सांवगी पि.सी.ला जोडणारा रस्ता व पूल नसल्याने नागरीकांना पावसाळ्यामध्ये पाण्यात प्रवास करावा लागत होता. सदरील रस्त्यामुळे खैरी, गिरगाव व चारठाणा आदी गावांना जाण्यासाठीचा प्रवास सुखकर होणार आहे. आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारकडून रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला गेला आहे. रस्ते कामाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी दशरथ ताठे, भगवान ताठे, यशवंत ताठे, उद्धवराव थिटे, पंडीत खवणे, लक्ष्मण चाळक, लक्ष्मण ताठे, गणेश ताठे, हरिओम ताठे, कल्याण ताठे यांच्यासह गावकर्यांनी पुढाकार घेतला.