ब्राह्मण समाज सतत ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामध्ये : बाजीराव धर्माधिकारी; गुणवंतांचा सत्कार व समाजभूषण पुरस्काराचे सेलूत उत्साहात वितरण

ब्राह्मण समाज सतत ज्ञानदानाच्या पवित्र कार्यामध्ये : बाजीराव धर्माधिकारी; गुणवंतांचा सत्कार व समाजभूषण पुरस्काराचे सेलूत उत्साहात वितरण

श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचा उपक्रम, यशवंत चारठाणकर, देवीदास सोन्नेकर, प्रा.संजय पिंपळगावकर यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

या वेळी मार्गदर्शन करतांना शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गोविंदभाऊ जोशी म्हणाले की; गुणवंताचा सत्कार हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचा मार्ग निवडायला हवा. विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनाकडे लक्ष द्यायला हवे. आरक्षण हा मुद्दा ब्राह्मण समाजाने कधी मागितला नाही. ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांनी देवी सरस्वतीच्या आराधनेकडे लक्ष देऊन विद्यार्जनाकडे लक्ष द्यायला हवे. मराठी भाषेच्या अचूकतेकडे गोविंदभाऊ जोशी यांनी या वेळी लक्ष वेधले. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनी देखील ज्ञानार्जन करताना उत्तम शिक्षण घेऊन उत्तम शिक्षण द्यावे,असे मत व्यक्त केले.

सेलू जि.परभणी : आरक्षणाने समाज प्रबळ न बनता दुबळा होतो. त्यासाठी ब्राह्मण समाजाने कधीच आरक्षण व संरक्षण न मागता सतत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले, असे प्रतिपादन परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी सेलू येथील श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजिक ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गोविंदभाऊ जोशी उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, पुणे येथील प्रसिद्ध मूर्तिकार अश्विनी मंडलिक, ब्राह्मण सभेचे नेते दीपक रणवरे श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुनील कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक रामराव सावंगीकर मामा, प्रसिद्ध साहित्यिक व शिक्षिका डॉ.जयश्री सोन्नेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मंत्रघोषात भगवान श्री परशुरामाच्या मूर्तीचे व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. सीमा आष्टीकर यांनी यावेळी स्वागत गीत सादर केले. यावेळी समाजभूषण पुरस्काराने संगीत क्षेत्रातील यशवंत चारठाणकर, क्रीडा क्षेत्रातील देवीदास सोन्नेकर, आध्यात्मिक क्षेत्रातील प्रा.संजय पिंपळगावकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ.अनुपमा जवळेकर यांनी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या कार्याचे व समाजातील तरुणांनी निःस्वार्थ भावनेने एकत्र येऊन समाज एकसंघ करण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. तसेच महिला एकीकरणाबाबत समाजात चालू असलेल्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. प्रा.संजय पिंपळगावकर, क्रीडा शिक्षक देविदास सोन्नेकर यांनी सत्काराला उत्तर देताना सेलू शहरात चालू असलेल्या श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या कार्याचे अभिनंदन केले. या सत्कारामुळे निश्चितच आमची जबाबदारी वाढली असून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप बसली आहे, असे स्पष्ट केले. यानंतर समाजातील क्रीडा तसेच दहावी, बारावी व बीटीएस व विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या पालकांसमवेत सन्मान करण्यात आला. अश्विनी मंडलिक यांनी देखील मनोगतात सेलूच्या श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या कार्याचे कौतुक करून वेद आणि ब्राह्मण याबाबत आपण लवकरच एक उपक्रम राबवणार आहोत व त्यासाठी सर्व समाजाचे सहकार्य अपेक्षित आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी दिपक रणनवरे म्हणाले की; सध्या परिस्थिती अशी आहे की सध्या केवळ गुण मिळवणे यातून समाधान आहे. पण उत्तम व्यक्ती म्हणून या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे. उत्तम मनुष्य घडवावा यासाठी हा कार्यक्रम आवश्यक आहे. समाजात जबाबदार नागरिक देखील घडले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले आहे. अध्यक्षीय समारोपात शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते गोविंदभाऊ जोशी म्हणाले की; गुणवंताचा सत्कार हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचा मार्ग निवडायला हवा विद्यार्थ्यांनी स्व-अध्ययनाकडे लक्ष द्यायला हवे. आरक्षण हा मुद्दा ब्राह्मण समाजाने कधी मागितला नाही. ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांनी देवी सरस्वतीच्या आराधनेकडे लक्ष देऊन विद्यादानाकडे लक्ष द्यायला हवे. यावेळी मराठी भाषेच्या अचूकतेकडे गोविंदभाऊ जोशी यांनी लक्ष वेधले विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनी देखील ज्ञानार्जन करताना उत्तम शिक्षण घेऊन उत्तम शिक्षण द्यावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा राजवाडकर यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन गजानन मुळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन बालाजी देऊळगावकर यांनी मानले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!