सेलूतील वीरशैव स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; शिवा संघटनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
सर्व्हे नंबर ३३ मधील वीरशैव स्मशनभूमीची अवस्था अत्यंत दयनीय व गंभीर झाली असून नाल्याचे पाणी स्मशान भूमीत घुसुन जागोजागी खड्डे पडून पाणी साचून सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मयताचा दफनविधी करणे अत्यंत अवघड झाले असून मृतदेहाची विटंबना होत आहे.
सेलू : येथील वीरशैव समाजाला स्मशनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटना तालूका शाखा सेलूच्या वतीने जिल्हाधिकारी परभणी यांना २० जून २०२४ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की,येथील सर्व्हे नंबर ३३ मधील वीरशैव स्मशनभूमीची अवस्था अत्यंत दयनीय व गंभीर झाली असून नाल्याचे पाणी स्मशान भूमीत घुसुन जागोजागी खड्डे पडून पाणी साचून सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मयताचा दफनविधी करणे अत्यंत अवघड झाले असून मृतदेहाची विटंबना होत आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्यामुळे गैरसोयीत अधिकच वाढ झाली आहे. गैरसोयी दूर करून स्मशान भूमीची स्वच्छता करण्याची मागणी अनेक वेळा करूनही पालिका प्रशासनाकडून निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात येते. त्यामुळे वीरशैव समाजावर एक प्रकारे पालिका प्रशासनाकडून जाणून बुजून अन्याय केला जात आहे. अशी भावना निर्माण झाली आहे. तसेच शासनाच्या शिवा मोक्षधाम योजनेचा जिल्हाभरात बोजवारा उडाला आहे. त्यामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला असून संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या शिवा मोक्षधाम योजनेअंतर्गत स्मशान भूमीसाठी नवीन जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर उपजिल्हाप्रमुख शिवकुमार नावाडे, तालुका प्रमुख निजलिंगअप्पा तरवडगे, प्रदीप डफुरे, कैलास मलवडे ,प्रकाश साखरे, शंकर राऊत, सुजित मिटकरी, गुरूबस पंचगले, बबनप्पा झमकडे, मनोहर चलोदे, सुनिल नवघरे, देवराव चौरे, गणेश केशरखाने, नवनाथ सोनटके आदींसह समाज बांधवांच्या सह्या आहेत.