प्राध्यापक गणेश शिंदे : गुणपत्रिकेची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे; दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने सेलूमध्ये गुणवंतांचा गौरव

प्राध्यापक गणेश शिंदे : गुणपत्रिकेची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे; दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने सेलूमध्ये गुणवंतांचा गौरव

नवीन तंत्रज्ञान शोधून स्वीकारले, तरच जगाच्या स्पर्धेत आपण टिकणार आहोत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे अंधानुकरण करू नका. स्वतःतील वेगळेपण शोधा. चिकित्सा करा, सारासार विचार करून करिअरचा निर्णय घ्या. संकटाशी लढा. तारतम्य बाळगून आयुष्य जगता आले पाहिजे. प्रत्येकाने स्वत:ला सिद्ध करण्याची गरज आहे. केवळ गुणपत्रिकेला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता नाही, असे मत प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी सेलू येथे व्यक्त केले.

प्राध्यापक गणेश शिंदे : गुणपत्रिकेची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे; दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने सेलूमध्ये गुणवंतांचा गौरव

सेलू जि.परभणी : दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी २३ जून रोजी दहावी, बारावी परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा मान्यवरांच्या हस्ते सेलू येथे गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक गणेश शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, संतोष पाटील, रोहिदास मोगल, मनिष बोरगावकर, रमेश पौळ,गुलाब ताठे, जयदत्त बावणे, रवि डासाळकर, रामेश्वर राठी, राजाभाऊ देवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी मार्गदर्शन करतांनी प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक गणेश शिंदे म्हणाले की; नवीन तंत्रज्ञान शोधून स्वीकारले, तरच आपण जगाच्या स्पर्धेत टिकणार आहोत. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे अंधानुकरण करू नका. स्वतःतील वेगळेपण शोधा. चिकित्सा करा, सारासार विचार करून करिअरचा निर्णय घ्या. संकटाशी लढा. तारतम्य बाळगून आयुष्य जगता आले पाहिजे. प्रत्येकाने स्वत:ला सिद्ध करण्याची गरज आहे. केवळ गुणपत्रिकेला आलेली सूज म्हणजे गुणवत्ता नाही. प्रा.शिंदे म्हणाले पुढे म्हणाले की, जिवनातील चांगूलपणा ओळखता आला, की जिवन जगणे सोपे होईल त्यामुळे  नोकरीच्यापुढे जावून उद्योगाकडे वळले पाहिजे. शिक्षणातून स्वाभिमानी बनले पाहिजे. शिक्षकांनीही चौकटीच्या पलीकडे जावून काम करण्याची आवश्यकता आहे.

प्रस्ताविकातून आमदार मेघना बोर्डीकर यांनी दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. अध्यक्षीय समारोप प्राचार्य कोठेकर यांनी केला. सूत्रसंचालन देवहूती गांजापूरकर व विजय चौधरी यांनी केले. मंजूषा सेलगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड.दत्तराव कदम, शंकर भोंडवे,अशोक अंभोरे,अर्जून बोरूळ, गणेश काटकर, वनिता चाफेकर, गणेश सवनणे, शिल्पा मंत्री, रूपाली ठाकूर, कपिल फुलारी, संदिप बोकन, दत्ता तांबे, बाळू काजळे, जयसिंग शेळके, वाल्मीक खुळे, प्रकाश शेरे, पप्पू शिंदे,विठ्ठल कोकर, प्रशांत ठाकूर आदींसह दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!