पीक विमा : सेलू तालुक्यातील खरीप पिका विमा तत्काळ जमा करावा; शेतकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

पीक विमा : सेलू तालुक्यातील खरीप पिका विमा तत्काळ जमा करावा; शेतकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

सेलू जि.परभणी : वालूर महसूल मंडळासह सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ या वर्षातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचा विमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात सोमवारी, २४ जून रोजी जिल्हाधिकारी यांना तहसीलदारमार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की सेलू तालुका तसेच वालूर महसुल मंडळामध्ये निर्सगाच्या लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे शेतकऱ्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डकडून पिक विमा काढून पिक संरक्षीत केले होते. परंतु, सदर विमा कंपनीने सोयाबीन पिक विमा काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. तक्रार करूनही बरेच शेतकरी अद्यापही पिक विम्यापासून वंचित आहेत. पिक विमा कंपनीला आदेश देवून शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात यावी. तसेच कंपनीने तात्काळ सोयाबीन पिक विम्याची रक्कम जमा न केल्यास चिकलठाणा फाटा (सेलू-देवगाव फाटा) राष्ट्रीय महामार्ग ५४८-B वर रास्ता रोको अंदोलनात करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर गाडेकर, अजय गाडेकर, गणेश मुंडे, संपत राठोड, अजिंक्य नाईक, रघुनाथ टाके, सोनू शेवाळे, दिलीप काकडे आदींच्या सह्या आहेत

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!