शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मंजूर करा; राज्य किसान सभेचे प्रशासनाला निवेदन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मंजूर करा; राज्य किसान सभेचे प्रशासनाला निवेदन

अन्यथा ‘रास्ता रोको’ आंदोलन

परभणी : सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ या वर्षातील खरीप हंगामातील सोयाबीन पिक विमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी, २४ जून रोजी जिल्हाधिकारी यांना तहसीलदारमार्फत निवेदनाद्वारे केली आहे. सेलू तालुका तसेच वालूर महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही आयसीआयसीआय लोम्बार्डकडून अद्याप पिक विम्याची रक्कम जमा करण्यात आली नाही. रक्कम तत्काळ जमा करावी; अन्यथा सेलू-देवगाव फाटाराष्ट्रीय महामार्गावर (५४८-ब) चिकलठाणा फाटा रास्ता रोको अंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर गाडेकर, अजय गाडेकर, गणेश मुंडे, संपत राठोड, अजिंक्य नाईक, रघुनाथ टाके, सोनू शेवाळे, दिलीप काकडे आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तेलंगणाप्रमाणे कर्जमाफी द्या, खरीप २०२१ हंगामातील परभणी जिल्ह्याची रिलायन्सकडील थकीत पीकविमा भरपाई रुपये ४७६ कोटी तत्काळ व्याजासह अदा करा तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजने अतर्गत खरीप व रब्बी हंगाम २०२३-२४ कालावधीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई तत्काळ द्यावी यासह अन्य मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
किसान संघर्ष सप्ताहअंतर्गत मंगळवारी, २५ जून रोजी कृषी आयुक्त तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय पीक विमा समितीचे अध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की; परभणी जिल्ह्यातील खरीप हंगामात गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पिकांचे विशेषतः सोयाबीन,कापूस, तूर,उडीद,मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या प्रकरणी सरकारने रीतसर परभणी जिल्ह्यातील बहुसंख्य महसूल मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. खरीप हंगामात उद्भवलेल्या सर्व बाधित महसूल मंडळात अग्रिम पीकविमा भरपाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अधिसूचना काढून २५ टक्के अग्रिम पीकविमा भरपाई अदा करण्यात आली. मात्र अंतिम पीक विमा भरपाई अद्याप अदा करण्यात आलेली नाही. उलट पक्षी सुमारे ७० हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आयसीआयसीआय-लोम्बार्ड या पीकविमा कंपनीने कोणतीही शहनिशा न करता फेटाळल्या आहेत.
रब्बी २०२३-२४ हंगामात प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हरभरा, गहू, रब्बी ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महसूल मंडळात २५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्र बाधित व नुकसानग्रस्त आहे. जिल्ह्यातील २५ महसूल मंडळात नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत प्रचंड अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पीकविमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या नाहीत. महसूल प्रशासनाने नुकसानीची नोंद घेतली आहे. यातील बाधित शेतकऱ्यांना मदतदेखील देण्याची सरकारने घोषणा केली होती. मात्र, आयसीआयसीआय-लोम्बार्ड या पीकविमा कंपनीने सरकार बरोबर केलेला करार आणि सरकारी निर्णय याचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी आयसीआयसीआय-लोम्बार्ड या पीकविमा कंपनी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग उडीद या पिकांचा अंतिम पीकविमा भरपाई तत्काळ अदा करा. रब्बी हंगामातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त हरभरा, गहू व रब्बी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ शंभर टक्के संपूर्ण जोखीम रक्कमेची पीकविमा भरपाई अदा करा. सिंचन अनुशेष वाढविणारे व कालवे तोडणारे शक्तीपीठ आणि समृद्धी महामार्ग रद्द करा, बेकायदेशीर प्रीपेड मीटर योजना रद्द करा. अदानीच्या कंपनीला दिलेले टेंडर रद्द करा. खरीप हंगाम २०२४-२५ साठी पतमर्यादेत ५० टक्के वाढ करून एकरी एक लाख पीक कर्ज द्या. खरीप हंगाम २०२४-२५ साठी पतमर्यादेत ५० टक्के वाढ करून एकरी एक लाख पीक कर्ज द्या. आदींसह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड राजन क्षीरसागर, शिवाजी कदम, ओमकार पवार, नीलकंठ जोगदंड माउली मुंडे, चंद्रकांत जाधव, रामप्रसाद अंभुरे आदींची उपस्थिती होती.

अन्यथा ‘रास्ता रोको’ आंदोलन

परभणी : सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२३-२४ या वर्षातील खरीप हंगामातील सोयाबीन पिक विमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी, २४ जून रोजी जिल्हाधिकारी यांना तहसीलदारमार्फत निवेदनाद्वारे केली आहे. सेलू तालुका तसेच वालूर महसुल मंडळातील शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही आयसीआयसीआय लोम्बार्डकडून अद्याप पिक विम्याची रक्कम जमा करण्यात आली नाही. रक्कम तत्काळ जमा करावी; अन्यथा सेलू-देवगाव फाटाराष्ट्रीय महामार्गावर (५४८-ब) चिकलठाणा फाटा रास्ता रोको अंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर गाडेकर, अजय गाडेकर, गणेश मुंडे, संपत राठोड, अजिंक्य नाईक, रघुनाथ टाके, सोनू शेवाळे, दिलीप काकडे आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

पूर्ण…

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!