इरळद येथे कृषी दिनानिमित्त रॅली

इरळद येथे कृषी दिनानिमित्त रॅली

बोर्डीकर कृषी महाविद्यालयाचा उपक्रम

सेलू : येथील बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या सातव्या सत्रातील कृषी दुतांमार्फत मानवत तालुक्यातील इरळद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कृषी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने फेरी काढण्यात आली. कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाणाऱ्या भारत देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून एक जुलै कृषीदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते ‘पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा’ होत, असे यावेळी कृषीदूतांनी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले तसेच रॅली काढण्यात आली. कार्यक्रमासाठी अरुण इंगळी, यश गायकवाड, वाय.ए.गायकवाड. ए.ए.गवळी, ए.डी.इंगळे यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य डॉ. ए. ए. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक डॉ. एन.एन. चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा ए. पी. देशमुख यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!