वृक्षलागवड व संवर्धन काळाची गरज : बीडीओ अमितकुमार मुंडे; काजळी रोहीण्यात वृक्षारोपण
५०० वृक्षलागवडीचा ग्रामपंचायतीचा संकल्प
सेलू, दि.४ (प्रतिनिधी) : वाढत्या तापमानामूळे नागरीक त्रस्त होत आहेत.उन्हाळ्यामध्ये तर तापमान खूप वाढत असून याचे मूख्य कारण वृक्ष तोड असल्याने जर जगायचे असेल तर वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे यांनी केले आहे. जिल्हा परिषद शाळा येथे ग्रामपंचायत आयोजित वृक्षरोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विस्तार अधिकारी प्रभाकर शिंदे, मधूकर उमरीकर, सरपंच अर्चना इंद्रोके, भारत इंद्रोके, राजीव वाव्हूळे, ज्ञानेश्वर डोईफोडे, श्रीकांत घुबे, सत्यनारायण निर्मळ, अंगवाडीताई सावित्रीबाई निर्मळ, मनिषा वाघमारे आदींची उपस्थिती होती. गटविकास अधिकारी मुंडे म्हणाले की; प्रत्येक नागरीकांनी झाडे लावून त्याचे जतन केले पाहिजे काजळी रोहीणा येथे सन २०२४ अंतर्गत वृक्षरोपण करण्यात येत असून ती लागवड केलेली झाडे कशी जगवता येतील त्यासाठी प्रयत्न करावा गावकर्यांनी वृक्षाचे पालकत्व स्वीकारून त्याचे जतन करावे असे ही अवाहन यावेळी त्यांनी केले. तर सरपंच यांनी ५०० वृक्ष लागवड करून ती जोपासणार असल्याचे यावेळी अश्वासन दिले. शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारासाठी भाजीपाला लागवड करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्याध्यापकांनी सांगीतले यावेळी विद्यार्थ्यासह नागरीकांची उपस्थीती होती.