शेतकरी आक्रोश मोर्चा : सेलू उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शेतकरी

शेतकरी आक्रोश मोर्चा : सेलू उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शेतकरी

सेलूतील लोकमान्य टिळक पुतळा परिसरापासून शनिवारी, सहा जुलैरोजी सकाळी दहा वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. क्रांती चौक, गोविंद बाबा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा धडकणार आहे. निवेदन देवून भव्य सभा होणार आहे, असे आयोजकांंनी कळविले आहे.

सेलू (जि.परभणी) : महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या विविध फसव्या घोषणा, जाहिरातबाजी करून घोर निराशा पदरात पडल्यामुळे शेतकऱ्यांचे जिवावर स्थापन केलेल्या सरकारला त्यांची जागा दाखविण्याकरिता माजी आमदार विजयराव भांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सेलू उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी, सहा जुलै रोजी भव्य शेतकरी अक्रोश मोर्चा धडकणार आहे. शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी ज्या ज्या पिकांचा पिकवीमा भरला आहे. अशा सर्व पिकांचा शंभर टक्के पिकवीमा सरसगट शेतकऱ्यांना देण्यात यावा, पीक विमा भरताना शेतकऱ्यांच्या सातबारावरचे नाव तात्काळ दुरूस्तु करून देण्यात यावे, पी.एम. किसन योजनेचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांना तक्रार करूणही मिळाले नाही. तरी ते पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरजमा करण्यात यावे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी,सुशिक्षीत बेरोजगार युवकांचे बँकेतील कर्ज प्रकरणे तात्काळ मार्गी लावावे, शेतकऱ्यांच्या मालाला कापुस १२,००० हाजार रूपये, सोयाबीन ७५०० हाजार रूपये प्रमाणे हमी भाव मिळाला पाहिजे, नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये सानुगृह अनुदान खात्यावर जमा करण्यात यावे, वयोवृध्द शेतकऱ्यांचे शासकिय आनुदान व विमा रक्कम केवळ के. वाय. सी. होत नसल्याने मिळत नाही आस्या शेतकऱ्यांना आकांऊट पे चेक व्दारे देण्यात यावी, शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित दिवसा १८ तास लाईट देण्यात यावी, सेलू तालुक्यातील हादगाव पावडे येथे काही वर्षापासून १३२ के.व्ही.वीज केंद्र मंजुर झालेले आहे. त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या सिंचन विहीरीचे कुशलचे बील तात्काळ अदा करण्यात यावे, रमाई आवास योजनेचे मंजुर घरकुलचे पैसे लाभार्थी यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे व बऱ्याचा गावाचे नवीन प्रस्ताव दाखल केलेले आहेत ते तात्काळ मंजुर करण्यात यावे,अहिल्यादेवी होळकर सिंचन विहीरीचे व घरकुलचे मंजुर झालेले पैसे लाभार्थी यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे व बऱ्याच गावातून नवीन विहीरीचे व घरकुलाचे प्रस्ताव दाखल केले आहेत ते तात्काळ मंजुर करण्यात यावे, यशवंतराव चव्हाण व पंतप्रधान मोदी ओबीसी, शबरी, अल्पसंख्याक आवास घरकुल योजनेचे बऱ्याच गावातील प्रस्ताव दाखल आहेत ते तात्काळ मंजुर करावे, विजरोधक यंत्र तलाठी सज्जाच्या गावात तात्काळ बसविण्यात यावेत,अवकाळी पाऊस वाऱ्यात ज्या शेतकऱ्यांचे सोलार पंप पत्र्याचे शेडचे झालेले नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे, प्रजन्यमापक यंत्र प्रत्येक गावत बसविण्यात यावे, शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यापासुन होणारे नुकसान रोखण्यासाठी त्यांना कंपाऊंड तारेसाठी अनुदान देण्यात यावे, श्रावणबाळ, संजय गांधी, निराधार, विधवा, परित्यक्ता योजनेसाठी उत्पन्नाची २१,००० रूपयांची अट रद्द करून ५०,००० रूपये एवढी उत्पन्नाची मर्यादा करण्यात यावी, सेलू व जिंतूर तालुक्यात संजय गांधी, श्रावण बाळ, विधवा, परित्यक्ताचे नवीन प्रस्ताव दाखल केलेले आहेत ते प्रस्ताव मीटींग घेऊन मंजुर करण्यात यावेत, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुरनगठन करण्यात यावे, सीबीलची कुठलीही अट ठेवण्यात येऊ नये. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, शबरी वित्त विकास महामंडळांसह इतर सर्व महामंडळातील कर्ज प्रकरणे तात्काळ मंजुर करून निधी वितरित करण्यात यावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!