वर्गमित्रांची ग्रेट भेट : ४९ वर्षांनंतर जागवल्या शालेय आठवणी

वर्गमित्रांची ग्रेट भेट : ४९ वर्षांनंतर जागवल्या शालेय आठवणी

सेलूतील नूतन विद्यालयात जमले १९७५ च्या दहावीच्या बॅचचे वर्गमित्र

सेलू : येथील नूतन विद्यालयातील माजी विद्यार्थी १९७५ च्या बॅचच्या वर्गमित्रांची बुधवारी तीन जुलैरोजी सेलू् येथील नूतन विद्यालयात तब्बल ४९ वर्षांनंतर अविस्मरणीय अशी ग्रेट भेट झाली. यावेळी शालेय आठवणी जागवत एकमेकांच्या चेहर्‍यावर हसू फुलून गेले.
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा वर्धापनदिन आणि दलित मित्र श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ४९ वर्षांनंतर वर्गमित्र एकमेकांना भेटले. समारंभाचे प्रमुख पाहुणे होते १९७५ च्या दहावीच्या परीक्षेत मराठवाड्यातून द्वितीय क्रमांक मिळवलेले नूतन विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि दिल्ली आयआयटीतील प्राध्यापक डॉ.संजीव देशमुख. यानिमित्ताने नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहचिटणीस तथा प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश बिहाणी, विजय बिहाणी तसेच दिपक जैस्वाल, राजाराम जाजू, विजय मंत्री, अहमद मिर्झा बेग आदींसह विविध क्षेत्रात आपापले कर्तृत्व सिद्ध केलेल्या सर्वच वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!