परभणी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; ४.५ रिश्टर स्केलची नोंद
नागरिकांनी घाबरून जावू नये : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
परभणी : हिंगोली शहराचा केंद्रबिंदू असणाऱ्या बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर ४.५ नोंद झाली आहे. हा अतिसौम्य भूकंप असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
१० जुलै रोजी नांदेड शहर व परभणी जिल्ह्यामधील काही भागात सकाळी ७ : १५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून, या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर ४.५ नोंदविण्यात आलेली आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून, नांदेड व परभणी जिल्ह्यातील काही भागात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. परभणी जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.