ऑल इंडिया पँथर सेनेची पाच जागांची मागणी : राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांची माहिती 

ऑल इंडिया पँथर सेनेची पाच जागांची मागणी : राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांची माहिती 

सेलू येथे पत्रकार परिषद

सेलू : ऑल इंडिया पँथर सेनेला आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सामावून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत पँथर सेनेसाठी पाच जागांची प्रस्तावासह मागणी करण्यात आली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी ही माहिती दिली आहे.

सेलू येथील शासकीय विश्रामगृहात बुधवार, १० जूलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विनोद मोळे, अशोक पाटील, कुणाल इंगळे, निवृती वाघमारे, सूबोध काकडे, रोहन आकात, विनोद धापसे, इरफान लाला, सुधीर सावंत, ऋतिक सावंत यांची प्रमुख उपस्थीती होती.

श्री केदार म्हणाले की; संविधान बचाव या सामूहिक सकारात्मक भूमिकेतून आम्ही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत राहून काम केले. त्यानंतर ऑल इंडिया पँथर सेनेचे विनोद मोळे यांनी महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली. भेटी दरम्यान पँथर सेनेला आगामी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीत सामावून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे पँथर सेनेसाठी विधानसभा निवडणुकीत पाच जगांची मागणी करण्यात आली आहे.‌यात आरक्षीत मतदार संघासह मुसलिम, दलित बहुसंख्येने मतदार असलेल्या मतदारासंघाची चाचपणी व पाहणी करण्याचे काम सूरू आहे. त्यामूळे महाविकास आघाडी इंडिया पँथर सेनेला सोबत घेवून सामोरे जाईल, असा आत्मविश्वास दिपक केदार यांनी या वेळी व्यक्त केला

दरम्यान, महाराष्ट्रातील विविध भागात घडणार्‍या घटनांचा अभ्यास केला तर आजही आमची अवस्था जनावरांसारखी झाली आहे. येवला, सातारा, अमरावती येथील अन्यायकारक घटना पाहता दलित मुस्लिम व अदिवासी समाजाचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर झाला असल्याची माहिती पत्रकारांशी संवाद साधतांना दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!