लोकसंख्या : २०६० नंतर भारताच्या लोकसंख्येत होईल घट; तरीही सर्वाधिक लोकसंख्या भारताचीच
वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : भारताची लोकसंख्या सन २०६०च्या दशकाच्या सुरुवातीला सुमारे १.७ अब्जांपर्यंत पोहोचेल. त्यानंतर यात १२ टक्क्यांनी घट होईल; मात्र तरीही भारत शतकभर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.
🔸काय आहे अहवालात?
■ ‘द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स २०२४’ अहवाल गुरुवारी प्रकाशित
■ पुढील ५० ते ६० वर्षांपासून जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत जाईल
■ २०२४च्या ८.४ अब्ज लोकसंख्येच्या तुलनेत २०८०च्या मध्यापर्यंत ती १०.३ अब्जांवर पोहोचेल
शिखरावर पोहोचल्यानंतर शतकाच्या अखेरीस जागतिक लोकसंख्या हळूहळू कमी होऊन १०.२ अब्जावर येईल
🔸भारत अग्रस्थानीच …
♦मागील वर्षी चीनला मागे टाकत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला
■ सन २०२४मध्ये भारताची लोकसंख्या १.४५ अब्ज असून, २०५४मध्ये ती १.६९ अब्जावर जाईल
■ २०६०च्या दशकाच्या सुरुवातीला सुमारे १.७ अब्जावर पोहोचल्यानंतर ती १२ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता
♦सन २१००मध्ये या शतकाच्या अखेरीस लोकसंख्या १.५ अब्जापर्यंत घसरण्याचा अंदाज
♦तरीही सन २१००पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारत अग्रस्थानीच राहील
🔸पाकिस्तानमधील जन्मदर
■ पाकिस्तानची लोकसंख्या २०५४पर्यंत ३८.९ कोटींपर्यंत पोहोचेल.
■ अमेरिकेला मागे टाकून पाक त्यावेळी जगातील तिसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल.
■ ३४.५ कोटी लोकसंख्येसह अमेरिका सध्या जगातील तिसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश.
🔸चीनच्या लोकसंख्येत घसरण
■ चीन सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश
■ देशाची २०२४मधील लोकसंख्या १.४१ अब्ज
🔸जगभरातील स्थिती
■ सध्या चीन, इटली, कोरिया प्रजासत्ताक आणि स्पेनसह जवळपास एक-पंचमांश देशांमध्ये कमी प्रजनन क्षमता
■ यामध्ये प्रत्येक स्त्रीकडून १.४पेक्षा कमी जिवंत मुलांना जन्म सध्याचा जागतिक प्रजनन दर प्रतिस्त्री २.२५ जिवंत मुले सन १९९०मध्ये हाच दर ३.३१ जिवंत मुले होता.
Credit : वृत्तसंस्था/मटा