देशासह राज्यातील महिला असुरक्षित : मनीषा केंद्रे

देशासह राज्यातील महिला असुरक्षित : मनीषा केंद्रे

परभणीत उरण व शिळफाट्याच्या महिला अत्याचाराचा घटनेचा निषेध; जिल्हा प्रशासनास निवेदन

परभणी : देशासह राज्यात महिला अत्याचाऱ्यांच्या घटनेत दिवसेदिवस प्रचंड वाढ होत असून राज्यात गावगुंडाला कायद्याचा धाक राहिला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ( शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष मनीषा केंद्रे यांनी केला. परभणी येथील महात्मा फुले पुतळ्या समोर उरण व शिळफाटा येथील अमानवीय घडलेल्या महिलावरील अत्याचाराविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी केंद्रे बोलत होत्या.
याप्रसंगी शासनाचा कडाडून विरोध करत, महिलांवरील राज्यातील अत्याचाराच्या मालिका न थांबल्यास शरद पवार गट राष्ट्रवादी महिला गट राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असाही इशारा जिल्हा प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोडमडली असून गृहमंत्री फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अशीही मागणी केली. उरण व शीळफाटा येथील अमानवीय घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेस न शोभणारी असल्याची खंत केंद्रे यांनी व्यक्त केली. निवेदनावर मनिषा केंद्रे, विनीता चव्हान, सलाम शेख, निर्मला लिपणे,आशा खिल्लारे, शेख रुखसाना, सीमा घनवटे, बिलकीस शेख, सविता अंभोरे, रेहानाबी, संगीता भराडे, जिलानबी,सायराबी,आशा साबळे, सुनेराबी, देऊबाई बोराडे, मंदाकिनी रेंगे, सुनेरा हमीद, सलमा, शमीमा, हैसरबी आदींसह परभणी जिल्ह्यातील महिला पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!