‘ त्या ‘ नराधमाला तत्काळ फाशी द्या : प्रेक्षा भांबळे
बदलापूर बालिका अत्याचार घटनेचा जिंतूरमध्ये जाहीर निषेध : महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
जिंतूर : महाराष्ट्राच्या कन्या राजमाता मासाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह छ.शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणीच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना बदलापूर जि.ठाणे या ठिकाणी घडली. सदर घटनेच्या निषेधार्थ महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिंतूरच्या वतीने जाहीर निषेध नोंदवत सौ.प्रेक्षाताई भांबळे- बोराडे यांनी सहकाऱ्यांसोबत तहसीलदार, जिंतूर यांना २२ ऑगस्टरोजी लेखी निवेदनाद्वारे सदर नराधमाला तात्काळ फाशी द्या अशी मागणी केली.
बदलापूर जि.ठाणे येथील प्रतिष्ठित संस्थेच्या शाळेत शिशुवर्गातील ३ वर्षीय बालिकांवर एका नराधामाने दोन वेळा अत्याचार केला. पहिल्या वेळेस अत्याचार होऊन व शाळा प्रशासनास माहिती होऊन देखील ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे सदर घटनेची पुनरावृत्ती झाली. निंदनीय बाब म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असून घटनेच्या दोन दिवसानंतर मुख्यमंत्री स्वतः या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना देखील केवळ त्यांच्या दौ-याला व्यत्यय होऊ नये म्हणून पोलिसांनी ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून लाडकी बहिणीच्या नावावर लाडकी खुर्ची घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारच्या काळात कोणतीही महिला, मुलगी सुरक्षित नाही. हे पुरोगामी विचाराचे राज्य आता राहिलेले नाही. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करावी, सदर नराधमाची केस फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी व शासनाने कठोर कार्यावाही करावी, तसेच नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. सदर शाळा व संस्था ब्लॅक लिस्ट करण्यात यावी, तसेच मुलींची केस नोंद करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्यात यावा व यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून कठोर कायदा व कायद्याची अमंलबजावणी करण्यात यावी, मुलींचा शाळा व महाविद्यालये या ठिकाणी महिला सेवकांच्या नियुक्त्या करण्यासाठी शासनाने कायदा पारित करावा अशी विनंती प्रेक्षाताई भांबळे-बोराडे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कडून शासनाला केली, अन्यथा युवती राष्ट्रवादी कॉंग्रेस- (शरदचंद्र पवार) जिंतूर यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यातून कायदा व सुव्यस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असे निवेद्वानाद्वारे म्हंटले आहे.
यावेळी मनीषाताई केंद्रे, साबिया बेगम कपिल फारुकी मॅडम, विठ्ठल घोगरे, आशाताई खिल्लारे, गणेशराव इलग, बाळासाहेब भांबळे, कैलास महाराज चारठाणकर, मनोहर सातपुते, दलमीर पठाण, दत्तराव काळे, मनोहर डोईफोडे, संजय अंभूरे, शौकत लाला, खय्युम कादरी, गजानन कांगणे, शंकर गंजे, बालाजी नव्हाट, अक्कू लाला, हकीम लाला, कांतराव धानोरकर, विशाल चोपडे, शेख रहीम कोककर, मोहसीन भाई, महेश घुगे, खालेक भाई राज, शिवाजी डोईफोडे, आदिनाथ वाव्ह्ळे, सय्यद तय्यब, मतीन बेग, इत्यादींसह अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.