साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती : सेलूत मातंग समाजाचा निर्धार मेळावा उत्साहात
सेलू : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त सेलू शहरातील श्री साई नाट्य मंदिरात अण्णाभाऊ यांचे नातू तसेच अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली निर्धार मेळावा उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे, ॲड.टी.एन.अण्णा कांबळे, डॉ.अनिल कांबळे, समाजभूषण पुरस्कार प्राप्त नथुराम अंभुरे, स्वागताध्यक्ष अशोक काकडे, जिपचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, पुरुषोत्तम पावडे, प्रकाशराव मुळे, सुधाकर रोकडे, रामेश्वर बहिरट, निर्मला लिपणे, रघुनाथ बागल, मिलिंद सावंत आदींसह मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी बोलतांना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी ताकदीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्यात मातंग समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण घोषणा आणि क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. माजी आमदार भांबळे यांनी सेलू शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक आणि अभ्यासिका देण्यात येईल. ज्यामुळे येणाऱ्या पिढ्यांकडून त्यांच्या विचारधारेचा प्रसार होईल आणि प्रेरणा मिळेल. या शिवाय, प्रत्येक गावात मातंग समाजासाठी सभागृह निर्माण करण्याचे वचन श्री.भांबळे यांनी दिले. या मेळाव्यात मातंग समाजाच्या गायरान चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले. उपस्थित मान्यवरांनी या विचारधारेला पाठिंबा दिला आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला.
सचिन साठे म्हणाले की; साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार खूप व्यापक आहेत. ते समजून घेत, त्यांच्या विचारांचे वारसदार होणे महत्वाचे आहे. मी अण्णाभाऊ साठे यांच्या रक्ताचा वारसदार आहे. मात्र, आपण सर्व अण्णाभाऊ यांच्या विचाराचे वारसदार आहात. याची जाणीव ठेवून, समाज सुधारला पाहिजे ही एकमेव भावना घेऊन आम्ही काम करत आहोत. आपल्याला ज्यांनी ज्यांनी मत म्हणून बघितले अशांना नाकारून आपल्याला जे माणूस म्हणून बघतील अशा चांगल्या माणसांना पुढे आणायचे आहे. माणसाला माणसापासून तोडणारी मनुवादी व्यवस्था तोडली गेली पाहिजे ” यावेळी डॉ.कांबळे, अशोक काकडे, राजेंद्र लहाने आदींनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अशोक उफाडे यांनी केले, सूत्रसंचालन राधाकिशन महाराज गोरे यांनी केले. रमेश डख, गणेशराव इलग, विनोद गायकवाड, कैलास महाराज देशमुख, राजेश उफाडे, विठ्ठल काळबांडे, सचिन शिंदे, गौस लाला, शेख दिलावर, मजीद बागवान, पंकज चव्हाण, बालकिशन साळवे, बाबा भदर्गे, अनिल डंबाळे, अंकुश लोंढे, अनिल तांबे, अंकुश तांबे, भानुदास घोडे, प्रल्हाद कान्हेकर, सुनील जोगदंड, विठ्ठलराव ताठे, विनोद राजूरकर, पवन कटारे, इरफान लाला, बापू बाविषे, दशरथ कांबळे, अशोक थोरात, महादेव थोरात, शेख तोफिक, गुड्डू भाई, बब्बु भाई, नीयाज भाई, लालू कुरेशी, संतोष ठाकूर, पवन मोरे तसेच मातंग समाज बांधव व राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.