डीजेच्या आवाजाने जिंतूरमध्ये एकाचा मृत्यू; तीघे जण अस्वस्थ

डीजेच्या आवाजाने जिंतूरमध्ये एकाचा मृत्यू; तीघे जण अस्वस्थ

जिंतूर : जिंतूर शहरातील श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने मंगळवारी,१७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला तर तिघे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. दरम्यान या तिघांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचाराकरीता रवाना करण्यात आले आहे. 

ताच्या नावे संदीप विश्वनाथ कदम असून शिवाजी कदम, शुभम कदम, गोविंद रामेश्वर कदम या तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातून श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीस सायंकाळी प्रारंभ झाला. जिंतूर पोलीस ठाण्यासमोर मिरवणूक आली असता, या मिरवणुकीतील एका मंडळाने आणलेल्या डीजेवरील कर्णकर्कश आवाजातील गाण्यावर कार्यकर्ते बेफान नाचत होते, त्यावेळी एका कार्यकर्त्यास अस्वस्थपणामुळे तातडीने जिंतूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या आवाजाने अन्य तिघे प्रचंड अस्वस्थ झाले, त्या तिघांना तात्काळ जिंतूर रुग्णालयात व तिथून परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले . दरम्यान, या मिरवणुकीत चार मंडळांनी डीजे आणले होते. अशी माहिती आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!