रविवारी ‘जालना जिल्हा बंद’ ची हाक

रविवारी ‘जालना जिल्हा बंद’ ची हाक

मंठा शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन, पोलिस निरीक्षकांना निवेदन 

जालना : मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणास समर्थन देण्यासाठी रविवारी २२ सप्टेंबर रोजी दिवशी अखंड मराठा समाजाच्या वतीने ‘जालना जिल्हा बंद’ची हाक देण्यात आली आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्यंने अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जालना जिल्हा अखंड मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

मंठा शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन 

मंठा : मराठा समाजाला इतर मागास प्रवर्ग (Other Backword Class) या प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रविवारी, २२ सप्टेंबर रोजी मंठा शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत मंठा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना शनिवारी, २१ सप्निटेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की; राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणास कंटाळून, जो पर्यंत मराठ्यांना ओबीसीमध्ये सरसकट आरक्षण मिळत नाही. तो पर्यत संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे परत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबविला आहे.

महाराष्ट्र गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची दिशाभुल करीत आहे. लोकशाही मार्गाने सतत आमरण उपोषण करुन जर संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांना न्याय मिळत नाही. राजकिय मंडळी केवळ फोटो काढण्यापुरते त्यांची भेट घेतात. खोटी अश्वासने देतात आणि परत आपले षडयंत्र चालू करतात. ही बाब अतिशय खेदजनक आहे.

महाराष्ट्र सरकारचा धिक्कार म्हणून आणि संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन २२ सप्टेंबर रविवार रोजी सकल मराठा समजाच्या वतीने मंठा शहर कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!