भगवान परशुराम महामंडळाला मंजुरी; परभणीसह जिल्हाभरात जल्लोष

भगवान परशुराम महामंडळाला मंजुरी; परभणीसह जिल्हाभरात जल्लोष

संघर्ष समितीच्या लढ्याला यश : संयोजक स्वप्निल पिंगळकर

परभणी : महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीला सोमवार, २३ सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महामंडळ स्थापनेसाठी संघर्ष समितीने उभारलेल्या लढ्याला यश आले असल्याचे मत संघर्ष समितीचे संयोजक स्वप्निल पिंगळकर यांनी व्यक्त केले.

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेला मंजुरी देण्यात आल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरात सोमवारी सायंकाळी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला तसेच महायुती सरकारचे आभार व्यक्त करण्यात आले.भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळा स्थापन करावे, या महामंडळास १००० कोटी निधीची तरतूद करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी विधिध संघटना, संस्था तसेच येथील परशुराम आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीच्या वतीने आंदोलने करण्यात आली. समस्त ब्राह्मण समाजातील तरुणांना व्यवसाय व उद्योग स्थापन करण्याकरिता तसेच रोजगार निर्माण व्हावे व शिक्षणासाठी आर्थिक मदत ही काळाची गरज आहे, असे निदर्शनास आणून देण्यात आले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १४ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे शिष्टमंडळ भेटले होते. त्यावेळी महामंडळ स्थापन करण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला होता. परंतु या संदर्भात निर्णय, त्यास मंजुरी न मिळाल्याने आजपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

या पार्श्वभुमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली. भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी मिळाल्याचे वृत्त समजताच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरात सोमवारी सायंकाळी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे संयोजक स्वप्निल पिंगळकर, नंदू पराडकर, विठूगुरू वझुरकर, योगेश जोशी सोनपेठकर, संतोष पाठक, दिपक कासंडे, अशोक सेलगावकर, सुप्रिया कुलकर्णी, मोहन कुलकर्णी, दिनेश नारवाडकर, राजेश देशपांडे, अभिषेक वाकोडकर, संजय कुलकर्णी, अमोल लंगर, पिंटू देशमुख, विश्वंभर दैठणकर, किशोर देशपांडे, विशाल जोशी, माणिक चौधरी, नरेंद्र कुलकर्णी, व्यंकटेश शर्मा, नितीन सावळीकर, प्रकाश देशपांडे, सुमित मिश्रा, नितीन शुक्ल, हनुमान जोशी, प्रदिप जोशी, योगेश पिंपळगावकर, पुरूषोत्तम तोताडे, रोहन धर्माधिकारी, सचिन शेटे, संदिप साळापुरीकर, डॉ. गजानन शेटे, आनंद कुलकर्णी, संदिप देशमुख आदीसह ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासाठी जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. तसेच विधी मंडळ अधिवेशन दरम्यान या प्रश्नावर आवाज उचलला होता, असे पिंगळकर यांनी म्हटले. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी परभणीतील ब्राह्मण समाजातील शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत भेट घडवून चर्चा करण्यासाठी आमदार साकोरे यांनी पुढाकार घेतला होता. विशेष म्हणज ब्राह्मण समाजाला महामंडळ मिळवून देण्याचा शब्द त्यावेळी दिला होता व तो शब्द मुख्यमंत्री यांनी पूर्ण केला आहे, असे पिंगळीकर यांनी म्हटले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!