अतिवृष्टी : विमा कंपनीकडून २५ टक्के अग्रीम तत्काळ मिळावे
सेलू येथील बळीराजा संघर्ष समितीची मागणी, तहसीलदारांना निवेदन
सेलू /परभणी : सेलू तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे विमा कंपनीकडून अग्रीम तत्काळ मिळावे या मागणीचे निवेदन सेलू येथील बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांना शुक्रवारी,२७ सप्टेंबररोजी दण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ३१ ऑगस्ट व १ सप्टेबर २०२४ रोजी परभणी जिल्ह्यासह सेलू तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. ज्यात शेतकऱ्यांच्या शेतातील्या उभ्या पिकासह पशुपक्षांची अतोनात जिवीत हानी होऊन अतोनात नुकसान झाले. विशेष म्हणजे सेलू तालुक्यातील काही मंडळात विक्रमी म्हणजे२४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरकारी यंत्रणेच्या मार्फत सर्व नुकसानाचे पंचनामे वेळेत झाले. नुकसानाची नोंद झाली; परंतु विमा कंपन्यांकडून अद्याप पर्यंत पंचवीस टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. ही बाब गंभीर आणि प्रचंड संताप आणणारी आहे. तात्काळ विमा कंपन्यांना आपल्या पातळीवरून आदेशित करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रीम रक्कम जमा होईल अशी कार्यवाही करावी ही विनंती.
त्याचप्रमाणे २०२१ साली सेलू तालुक्यातील वेगवेगळ्या पिकांचा शेतकऱ्यांनी विमा काढला. त्यासाली सरकारने महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली होती. २०२१ साली परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी ३७ मंडळावर विमा कंपन्यांनी अन्याय केला. त्यात सेतू तालुक्याच्या समावेश आहे. या प्रकरणी विशेष लक्ष घालून शासनाच्या ही बाब लक्ष्यात आणून द्यावी आणि विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांचे नुकसानाचे येणे असलेल्या नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी ही विनंती. निवेदनावर अध्यक्ष अशोक काकडे, रमेश माने, रमेश डख, विजय भुजबळ, रामेश्वर गाडेकर, प्रकाश मुळे, अशोक उफाडे, रामेश्वर पौळ, दत्तुसिंग ठाकूर, गणेशराव काष्टे, प्रवीण गाडेकर आदींच्या सह्या आहेत.