भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना जिंतूरमध्ये उत्साहात
माजी आमदार विजय भांबळे यांचा पुढाकार; कडूबाई खरात यांच्या भिमगीतांनी मने जिंकली
परभणी : जिंतूर तालुक्यातील सम्राट अशोक बुद्ध विहारात तथागतांची भव्य मूर्ती माजी आमदार विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून बुधवारी, दोन ऑक्टोबररोजी पूज्यनीय भदंत यांच्या हस्ते स्थापन झाली. यावेळी पूज्यभदंत डॉ.उपगुप्त महाथेरो (पूर्णा), पूज्यभदंत डॉ.इंदवंश महाथेरो (उत्तर प्रदेश), पूज्यभदंत मुदितानंद थेरो, पूज्य भदंत सुगत बोधी (नांदेड), पूज्य भदंत पय्याराक्खीत (पुणे), भंते विनयशिल बोधी (चामणी), भंते महानंद ( रायखेडा), माजी आमदार विजय भांबळे, डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे, प्रेक्षाताई भांबळे- बोराडे, लोकनेते विजयराव वाकोडे सर्व भिखुसंघ व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार भांबळे यांनी तथागत बुद्धाचे विचार जगाने स्वीकारले असून शांतीचा संदेश देणारे एकमेव मार्गदाते भगवान गौतम बुद्ध आहेत. त्यांनी दिलेला धम्म अनुसरला पाहिजे, असे उद्गार काढले नेहमीच तर जिंतूर सेलू तालुक्यातील बौद्ध बांधव नेहमीच माझ्या पाठीशी राहतात. त्यामुळे मी देखील त्यांच्या विंनती नुसार आम्रवन येथे विकास कामे, बोरी येथे बुदध विहार जिंतूर येथे बुद्ध विहार व आज माझ्या हातून बुद्ध मूर्तीची स्थापना झाली हे माझे भाग्य समजतो. यापुढे देखील बौद्ध बांधवांसाठी कधी कमी पडणार नाही असी ग्वाही दिली.
तसेच .प्रेक्षा भांबळे यांनी भगवान गौतम बुद्धाना वंदन करून आपले मनोगत व्यक्त केले. भगवान गौतम बुद्ध यांचे विचार अजरामर असून सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचे चक्र जगावर फिरवेल व जगाला शांतीचा संदेश दिला. हा धर्म महान आहे. माझे बौद्ध बांधव यांना न्याय देण्यासाठी माझे वडील माजी आमदार भांबळे यांनी जिल्हा समाजकल्याण सभापतीपद, पं.स.सभापतीपद सामान्य व्यक्तींना देऊन त्यांचा मानसन्मान केला. बेघर कुटुंबातील नागरिकांना रमाई आवास योजनेतून सहा हजार घरकुल मिळवून दिले. प्रत्येक गावागावात समाज मंदिर बांधून दिले ई. कामाचा उल्लेख केला.
देशाचे संविधान धोक्यात आहे, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, समाजात दुही पसरवणाऱ्यांनी आपापले डाव टाकायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत संपूर्ण देशाला मार्गदर्शन करेल, असा केवळ बुद्ध मार्ग आहे. शांतीचा, क्षमेचा, दयेचा बुद्धमार्ग! हा विचार घेऊन पुढे जातोय. तुम्ही सर्वजण सोबत आहात! नव्हे अनेक दशके मला तुमची साथ आहे. विजय भांबळे जो काही आहे, तो तुम्ही दिलेल्या शक्तीने आहे, असे मत सिद्धार्थ हत्तीअबिरे यांनी व्यक्त केले.
कडूबाई खरात यांच्या भिमगीतांनी मने जिंकली
यावेळी भिमकन्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भिमगायिका कडूबाई खरात यांनी, तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र, भिमा- भिमा या गाण्यांनी उपासकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामराव उबाळे यांनी केले. यावेळी मा.प्रा.जोंधळे सर, आशिष वाकोडे, विश्वनाथ राठोड, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, मधुकर भवाळे, बाळासाहेब भांबळे, बंटीभाऊ निकाळजे, मनीषाताई केंद्रे, आशाताई उबाळे, आशाताई खिल्लारे, संभाजी खिल्लारे, अशोक प्रधान, उत्तमराव शेजावळे, दिनकर आलाटे, वसंत पाईकराव, कमलाकर मोरे, सुखदेव वाव्ह्ळे, नामदेव प्रधान, बाळू वाकळे, सुरेश वाकळे, दीपक वाकळे, मनोज खंदारे, जिवन भवरे, वसंत निकाळजे, करून नागरे, राहुल कणकुटे, किशन मानवते, बंडू चव्हाण, पृथ्वीबाबा भांबळे, मिलिंद साळवे, कबीर साळवे, रवी ठोके, मिलिंद ठोके, बाबासाहेब खिल्लारे, राहुल साबळे, आदिनाथ वाव्ह्ळे, जगन वाकळे, सुदर्शन सूर्यवंशी, सखाराम कणकुटे, लक्ष्मीबाई कांबळे, पुरुषोत्तम आण्णा पावडे, कैलास महाराज, गणेशराव इलग, विजय खिस्ते, मनोहर डोईफोडे, सुधाकर रोकडे, निर्मलाताई लिपने, गोरख भालेराव, गंगाधर तरटे, पिंटू डोंबे, शोएब जानिमिया, मनोहर सातपुते, शौकत लाला, पप्पू गाडेकर, अविनाश मस्के, बबलू कदम हकीम लाला, दिलीप भवाळे, जिंतूर सेलू तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सर्व कार्यकर्ते व असंख्य उपासक, उपासिका, नागरिक उपस्थित होते.