‘ईव्हीएम’ बाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले ?

‘ईव्हीएम’ बाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले ?

‘जिंकता तेव्हा ‘ईव्हीएम’ हॅक नसते का?’ सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना प्रश्न; मतपत्रिकांची मागणी करणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली :  ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) फेरफार झाल्याचे आरोप पराभूत झाल्यावरच होतात,’ असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची मागणी करणारी याचिका मंगळवारी फेटाळून लावली. ‘निवडणूक जिंकल्यावर ‘ईव्हीएम’ मध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप होत नाही. निवडणूक हरल्यानंतरच ‘ईव्हीएम’ला दोष दिला जातो’ अशी टीका न्या. विक्रम नाथ आणि न्या. पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने केली. मतपत्रिकेवरील मतदानाबरोबरच मतदानादरम्यान मतदारांना पैसे, दारू किंवा इतर वस्तूंचे प्रलोभन दिल्याप्रकरणी दोषी आढळल्यास उमेदवारांना किमान पाच वर्षांसाठी अपात्र ठरविण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत. अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकाकर्ते के. ए. पॉल यांनी जनहित याचिका दाखल केल्याचे सांगितल्यावर खंडपीठाने ‘आम्ही असे प्रकरण कसे ऐकू शकतो? असा प्रश्न करून याचिका फेटाळली. तुमच्यासाठी अशा प्रकारच्या वादविवादाची ही (न्यायालय) जागा मतपत्रिकेसाठीकाँग्रेसची मोहीम नवी दिल्ली: मतदानयंत्रांऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी देशव्यापी मोहीम राबविण्याची घोषणा काँग्रेसने मंगळवारी केली. ‘निवडणुकांसाठी पुन्हा मतपत्रिकांचा वापर करावा, या मागणीसाठी आमचा पक्ष ‘भारत जोडो’ यात्रेच्या धर्तीवर देशभर प्रचार करेल,’ असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. अहमदाबादमध्ये बरीच गोदामे बांधण्यात आली आहेत. त्यांनी तिथे ही ‘ईव्हीएम’ नेऊन ठेवावीत, असे खर्गे म्हणाले. नाही. ‘ईव्हीएम’ बाबत राजकीय पक्षांना अडचण नाही, तुम्हाला का आहे ? तुम्हाला अशा कल्पना कुठून सुचतात ?’ अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली.

तीन लाखांहून अधिक अनाथ आणि ४० लाख विधवांचे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले. त्यावर ‘तुम्ही या राजकीय आखाड्यात का उतरत आहात ? तुमचे कार्यक्षेत्र खूप वेगळे आहे,’ असे खंडपीठाने म्हटले आहे.

इतर देशांत मतदान कसे ? पॉल यांनी आपण दीडशेहून अधिक देशांमध्ये फिरल्याचे सांगितल्यानंतर खंडपीठाने त्यांना विचारले, ‘प्रत्येक देशात मतपत्रिकेवर मतदान होते की इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर केला जातो?’ विदेशाप्रमाणे आपणही मतपत्रिकेवर मतदान घ्यावे, असे उत्तर देण्यात आले. त्यावर ‘सर्व जगापेक्षा वेगळे असावे असे तुम्हाला वाटत नाही का,’ असा सवाल खंडपीठाने विचारला. विविध विधानांचे संदर्भ ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक इलॉन मस्क यांनी ‘ईव्हीएम’ मध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असे म्हटले होते आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी तसे आरोप केले होते. या गोष्टी पॉल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. ‘चंद्राबाबू नायडू पराभूत झाले तेव्हा ‘ईव्हीएम’ मध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असे ते म्हणाले. आता या वेळी जगनमोहन रेड्डी पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी ‘ईव्हीएम’ च्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित केला आहे,’ याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

‘पैशाच्या वापरासाठी हवा आराखडा’

‘निवडणुकीत पैसे वाटले जातात हे सर्वांना माहित आहे,’ असे याचिकाकर्त्याने सांगितल्यावर खंडपीठाने म्हटले की, आम्हाला कोणत्याही निवडणुकीसाठी पैसे मिळाले नाहीत. ‘निवडणूक प्रचारादरम्यान पैसा आणि दारूच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा आणि अशा प्रकारांना कायद्याने शिक्षा करण्यात यावी,’ अशी विनंती याचिकेत करण्यात आल्याचे याचिकाकर्ते के. ए. पॉल यांनी सांगितले. एप्रिल महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या होत्या.


credit – Mata….

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!