सकारात्मक परिवर्तनासाठी ‘तेजज्ञान’ आवश्यक
सेलूतील ध्यान महोत्सवात प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांचे मत
सेलू/परभणी : मागील २५ वर्षांपासून तेजज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून अविरत चालणारे कार्य काळाची गरज आहे. जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तेजगुरू सरश्री यांचे विचार नियम; श्रवण, मनन, चिंतन, ध्यान आणि तेजज्ञान आवश्यक आहे, असे मत सेलू् येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी व्यक्त केले.
तेजज्ञान फाऊंडेशनच्या रजत जयंतीनिमित्त रविवारी, एक डिसेंबर रोजी सेलू येथील ध्यान ज्ञानकेंद्राच्या वतीने आयोजित ध्यान महोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.कोठेकर बोलत होते. याप्रसंगी विजय श्रीरामवार, गंगाधर कान्हेकर, डॉ.विलास मोरे, ज्ञानोबा ताठे आदींची उपस्थिती होती. या वेळी तेजगुरू सरश्री यांची विशेष वाणी ऐकविण्यात आली. शुद्ध ध्यानानेच अंतिम लाभ मिळतो. शरीर, मन, बुद्धी हे एक भाग असून स्वतःला जाणून घेण्यासाठी ध्यान महत्वाचे आहे, असे सरश्री सांगितले. विश्वशांती प्रार्थनेने समारोप झाला. सूत्रसंचालन मुरारी पावडे यांनी केले. ध्यान महोत्सवात तेजसेवक, तेजसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.