सर्वांना न्याय देत जबाबदारीचे सोने करणार : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
जिंतूर येथे भव्य नागरी सत्कार, जेसीबीने फुलांची उधळण करीत जल्लोषात स्वागत
जिंतूर/परभणी : राज्यमंत्रीमंडळात राज्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल सेलू-जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा भव्य नागरी सत्कार बुधवारी, २५ डिसेंबररोजी जिंतूर शहरातील बाजार समितीच्या प्रांगणात करण्यात आला. यानिमित्ताने शहरभर स्वागत कमानी झळकत होत्या. तर मुख्य मार्गावर मंत्री बोर्डीकर यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. याप्रंसगी सत्काराला उत्तर देतांना मंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, ” राज्यमंत्री म्हणून पक्षाने विविध पाच महत्वाच्या खात्याच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्या विभागाना योग्य न्याय देत निश्चितपणे जबाबदारीचे सोने करणार आहे”
व्यासपीठावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मीनाताई बोर्डीकर, गंगाधर बोर्डीकर, भावना बोर्डीकर तसेच नागरी सत्कार समितीचे मुकुंद सावजी कळमकर, दाते सर, गोविंद थिटे, वसंत शिंदे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, आत्माराम पवार, सुनील भोंबे, डॉ.पंडित दराडे, प्रमोद चव्हाण प्रकाश चव्हाण, सुनील खिस्ते ॲड.सुनील मते, ॲड.गोपाळ रोकडे, अभिजीत पारवे, किरण वट्टमवार, सत्यनारायण दरगड आदींसह मान्यवरांची उपस्थती होती.
मंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, माझा राजकीय प्रवास २०११ पासून सुरू झाला. बोरी जिल्हा परिषद सर्कलमधून सदस्य झाल्यानंतर आपल्या सर्वांच्या भक्कम पाठींब्याने २०१९ मध्ये व २०२४ मध्ये सलग दुसऱ्यांदा आमदारकीची माळ माझ्या गळ्यात पडली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जातीपातीचे राजकारण करत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. आपली अडीच वर्षे महाभयंकर कोरोनात व अडीच वर्षे सत्तेत गेली. जेवढा वेळ भेटला तेवढ्या वेळात फक्त जातीपातीचे राजकारण सोडून फक्त काम आणि सर्वांगीण विकास केला. याचे फलित आज मी राज्यमंत्री म्हणून आपल्या पुढे आहे, असे सांगून बोर्डीकर परिवार नेहमीच आपल्या सोबतच असेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर म्हणाले की, गेल्या ५० वर्षात सर्वात जास्त आनंद आज झाला. कारण आम्हाला जे ३०-३५ वर्षांच्या राजकारणा जमले नाही. ते मेघनादीदीने केवळ दोन टर्मच्या आमदारकीत चमत्कार घडवून करून दाखविले. सर्वांच्या भक्कम पाठिंब्यामुळे राज्यमंत्रीपदी निवड झाली व आपली इच्छा पूर्ण झाली. बोर्डीकर परिवार सत्तेत असेल किंवा नसेल पण हा परिवार समाजाच्या शेवटच्या घटकासोबत नेहमीच सत्तेत असेल, अशी ग्वाही बोर्डीकर यांनी यावेळी दिली.
या वेळी मुकुंद सावजी कळमकर, दाते सर यांनी मनोगत व्यक्त केले. या सत्काराचे आयोजनासाठी सत्कार समितीतील गोविंद थिटे, वसंत शिंदे, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, आत्माराम पवार, सुनील भोंबे डॉ.पंडित दराडे, प्रमोद चव्हाण, प्रकाश चव्हाण, सुनील खिस्ते ॲड.सुनील मते, ॲड.गोपाळ रोकडे, अभिजीत पारवे, किरण वट्टमवार, सत्यनारायण दरगड, सुभाष काबरा, गोविंद दायमा, सत्यनारायण शर्मा, संजय कोकडवार, भगवान देशमुख, रामभाऊ जाधव, संतोष देशमुख, कैलास खंदा,रे डॉ.दुगार्दास कान्हडकर, गजानन घुगे, शिवाजी काळे, रवी घुगे, प्रभाकर दराडे, पप्पू डोंबे, भगवान कऱ्हाळे, भगवान वटाने, प्रभाकर वाघीकर, गजानन चव्हाण, एकनाथ देशमुख, सागर शिंदे, संदीप लकडे, प्रदीप चौधरी, युवराज दुधगावकर, मतीन तांबोळी, रमेश ढवळे, संतोष ढोणे, रामप्रसाद घुगे, संदीप घुगे, डॉ.देवराव कऱ्हाळे, गिरीज जोशी, आथर भाई व माणिक हरकळ आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.