सर्वोत्तम कामांतून जनतेचा विश्वास सार्थ ठरविणार

सर्वोत्तम कामांतून जनतेचा विश्वास सार्थ ठरविणार

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्वाही, शुभेच्छांचा वर्षाने मंत्री बोर्डीकर भारावल्या

सेलू/परभणी : पाच महत्त्वाच्या खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडतांना, जिंतूर, सेलू शहर, तालुका आणि परभणी जिल्ह्यात विकासाची सर्वोत्तम कामे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. मंत्री झाले म्हणून कोणताही दुरावा ठेवणार नाही. भारतीय जनता पक्ष नेतृत्वाने आणि जिंतूर, सेलू तालुक्यातील जनतेने दाखविलेला विश्वास सर्वोत्तम विकास कामे करून सार्थ ठरविणार आहे. अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी गुरूवारी, २६ डिसेंबरोजी दिली.

गुरूवारी सायंकाळी समस्त सेलूकरांच्या वतीने आयोजित नागरी सत्काराला उत्तर देतांना मंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अध्यक्ष शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने होते. संध्याताई राठोड, मीनाताई बोर्डीकर, नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया,  प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, भावना मुंगसे बोर्डीकर, जयप्रकाशजी बिहाणी, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, नयनाताई दाते, डॉ.विद्याताई पाटील, ललिता गिल्डा, नंदकिशोरजी बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, संजय लोया, प्रा.के.डी.वाघमारे, संदीप लहाने, संतोष कुलकर्णी, दिनकर वाघ, गोविंद थिटे, ॲड.दत्तराव कदम, अशोक अंभोरे, राजेश देशमुख आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, मंत्री झाल्यानंतर मेघना बोर्डीकर प्रथमच शहरात आल्या होत्या. यानिमित्ताने स्वागत कमानी, मुख्यरस्त्यावर सडा घालून, तसेच भव्य अशी वाजतगाजत मिरवणूक, ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, जेसीबीने पुष्पहार घालून बोर्डीकर यांचे सेलूकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. रात्री अकरा वाजेपर्यंत मंत्री बोर्डीकर यांनी शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच विविध स्तरातील व्यक्ती, महिला, नागरिक, शालेय विद्यार्थिनी यांच्या शुभेच्छा, विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली.

मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की,  माझ्याकडे असलेल्या पाच महत्त्वाच्या खात्यामध्ये सर्वोत्तम काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे . जिंतूर सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता यावी. पाण्याअभावी वंचित २२ गावात पाणी तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचवायचे. २५ वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्ष कधीही विजेची समस्या येणार नाही असं काम मला यापुढे करून ठेवायचे. श्रीरामजी भांगडिया यांनी अत्यंत सुंदर रचना करून ठेवलेल्या सेलू शहराला अधिक सुंदर बनविण्याचे काम यापुढेही करत राहणार आहे. सेलू शहरासाठी चांगली पाणीपुरवठा योजना तयार आहे, अंडरग्राउंड ड्रीनेज, अंडरग्राउंड गॅस पाईपलाईन अशी अनेक सर्वोत्तम कामे करायची आहेत. आणि यासाठीची ताकद जनतेच्या माध्यमातून आपण मला देणार आहात असा विश्वास आहे.

ज्यांनी कायम बोर्डीकर परिवारावर विश्वास दाखवलेला आहे. अशा तळागाळातील कार्यकर्त्यासाठी आणि सामान्य जनतेसाठी मी कधीही कमी पडणार नाही, अशी ग्वाही बोर्डीकर यांनी दिली. प्रास्ताविक ॲड.दत्तराव कदम यांनी केले. सच्चिदानंद डाखोरे यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र राज्य गीताने सुरूवात झाली केले. प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, डॉ.संजय रोडगे यांनी मनोगत व्यक्त केले माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. अशोक अंभोरे यांनी आभार मानले.

नागरी सत्कार समारंभासाठी भाजप तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद खारकर, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, ॲड.संजय लोया, गणेश काटकर, डॉ.ऋतुराज साडेगावकर, कपिल फुलारी, रवि डासाळकर, अजय डासाळकर, डॉ.गणेश थोरे, रामेश्वर काजळे, संदीप बोकन, विठ्ठल कोकर, गणेश गोरे, अशोक शेलार, रुपाली ठाकूर, मोनिका देशमुख, ज्योती मोगल, संध्या चिटणीस अश्विनी घोगरे, आशा चव्हाण, बबीता ठाकूर, बेबीताई गव्हाडे, माऊली ताठे, पंजाब पौळ, अशोक सेलवाडीकर, अनिल पवार, मामा राठी, शिवहारी शेवाळे, भागवत दळवे, दीपक कोल्हाळ, रामेश्वर शेवाळे, भगवान डख, अर्जुळ बोरूळ, संदीप घुगे आदींसह भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!