पत्रकार राजाभाऊ नगरकर यांचा आगळावेगळा सन्मान

पत्रकार राजाभाऊ नगरकर यांचा आगळावेगळा सन्मान 

जिंतूर प्रेस क्लब आणि व्हाईस ऑफ मीडियाचा उपक्रम : नामदेव खेडकर, विकास राऊत पुरस्काराने सन्मानित

मोबाईलचा अतिवापर चिंताजनक : डॉ.विनोद बाबर

पत्रकार राजाभाऊ नगरकर यांचा आगळावेगळा सन्मान

परभणी : मागील ४० वर्षांपासून जिंतूर शहरासह ग्रामीण भागातील विविध जिव्हाळ्याच्या प्रश्नांसह सामाजिक आणि विकासात्मक प्रश्नांची आपल्या लेखणीद्वारे मांडणी करून, त्या धसास लावण्यासाठी वयाच्या पंचाहत्तरीतही उमेदीने कार्यरत असलेल्या राजाभाऊ नगरकर यांच्या पत्रकारितेचा सोमवारी जिंतूर (जि.परभणी) येथे गौरव करण्यात आला. अमृत महोत्सवानिमित्त श्री नगरकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सन्मानचिन्ह, सन्मान पत्र, पुणेरी पगडी घालून तसेच रोख एक लाख रुपयांची थैली भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

व्यासपीठावर व्याख्याते प्रा.डॉ.विनोद बाबर, व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल, सुंदरलाल सावजी अर्बन कॉपरेटिव बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर, उद्योजक ब्रिजभाऊ तोष्णीवाल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, प्रभाकर वाघीकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवरकर, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, संदीपभाई शर्मा महाराज, सुनील भोंबे पाटील, गोविंद थिटे पाटील, धरमचंद अच्छा, सुधीर शहाणे, सत्यनारायण शर्मा, वैद्यकीय अधीक्षक रविकिरण चाडगे, किरण वट्टमवार, रवी घुगे ,अरुण शहाणे, गोपाळ रोकडे, डॉ देवराव कराळे, देवेंद्र भुरे,गजानन देशमुख, प्राचार्य प्रिया देशमुख, गजानन घुगे, सुनील तोष्णीवाल, मनोज राजोतीया आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठवाडा विभागीय सामाजिक वार्ता दर्पण पुरस्कार नामदेव खेडकर यांना, तर विकास वार्ता पुरस्कार जेष्ठ संपादक विकास राऊत यांना प्रदान करण्यात आला.

मोबाईलचा अतिवापर चिंताजनक : डॉ. विनोद बाबर

या वेळी ‘आयुष्य फार सुंदर आहे ‘ या विषयावर डॉ.बाबर यांचे व्याख्यान झाले. डॉ.बाबर म्हणाले की, मोबाईलच्या अतिवापरामुळे भावी पिढी उध्वस्त होते. की काय अशी  भिती निर्माण झाली आहे. पालकांनी वेळीच आपल्या पाल्यांना सावध केले नाही. तर भविष्यामध्ये याचे गंभीर परिणाम सोसावे लागणार आहेत. मोबाईलपासून दूर राहण्यासाठी पालकांनी मुलांना परावृत्त करावे. स्वतःमध्ये असणारा इगो कमी करावा. याशिवाय जवळच्या माणसांनी चुका केल्या असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून जीवन जगावे.

जिंतूर तालुका प्रेस क्लब व व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. सूत्रसंचालन विजय चोरडिया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज सारडा, प्रा.पांडुरंग निळे, मंचक देशमुख, भागवत चव्हाण, संदीप माहुरकर, सचिन रायपत्रीवार, दिलीप माघाडे, राम रेघाटे, प्रशांत मुळी, अतुल जगताप,राहुल वाहुळे, नितीन बंगाळे, नितीन रोकडे, दिलीप देवकर, शंकर जाधव,
नागनाथ दाभाडे, संतोष तायडे, राजू गारकर, रामकिसन ठोंबरे,नेमीनाथ जैन ,आबासाहेब जाधव, राजाभाऊ काळे, पद्माकर कौसडीकर आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम केले.

पत्रकार राजाभाऊ नगरकर यांचा आगळावेगळा सन्मान

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!